त्यांच्या जाण्याने समाजसेवा आणि उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाची बातमी वसईतील नागरिकांसाठी अत्यंत दुःखदायक आहे. त्यांनी आयुष्यभर गरीब, गरजू आणि साईभक्तांच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या सामाजिक योगदानामुळे त्यांना 'गरिबांचे कैवारी' म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने वसई परिसरातील नागरिक, सहकारी, मित्रपरिवार आणि साईभक्तांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.