केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे:-
जिल्ह्यातील काही फुकटे राजकीय, सामाजिक आणि अधिकारी मंडळी वर्षभर पत्रकारांना बातम्या देऊन त्यांचा वापर करून घेतात. परंतु दिपावलीची जाहिरात मागितली तर जाहिरातीला कारणे सांगतात. वर्षभर बातम्या छापायच्या आणि जाहिरात किंवा भेट द्यायची नाही. अशा राजकीय जून्या व नवीन नेतृत्वाला उभारी देऊन पत्रकार कंटाळले आहेत.
नेत्यांच्या व लोकांच्या या धोरणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे. यासाठी ज्यांनी जाहिरात दिली नाही. त्यांची वर्षभर बातमी छापूच नये. ज्या प्रतिनिधींना (पत्रकारांना) जाहिरात मिळाली नसेल त्यांनी जर यापुढे अशा लोकांच्या बातम्या देण्याचे टाळले तर याचा निश्चितच चांगला परिणाम होईल. यासाठी सर्व पत्रकारांनी एकजूट करणे गरजेचे आहे. किमान वर्षभर तरी जाहिरात न देणाऱ्या नेत्यांच्या बातम्या अजिबात छापू नये. हीच भूमिका पत्रकार बंधूंनी घेण्याची गरज आहे.

