औरंगाबाद - जिल्ह्यातील पाटोदा या आदर्श गावाचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला असून पेरे पाटील यांची कन्या कन्या अनुराधा पेरे पाटील यांचा पराभव झाला आहे.
संपूर्ण राज्यात आपल्या ग्रामविकासाच्या कामांसाठी पेरे पाटील नावाजले जातात. यंदा त्यांनी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात न उतरता नव्या लोकांना गावाचा कारभार हाती घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांची मुलगी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उरतली होती. परंतु, अनुराधा पेरे पाटील यांना पराभव पत्कारावा लागला आहे.


