shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हृदयद्रावक घटना..!! संगमनेर तालुक्यातील पारेगाव गडाख येथे विजेची तार पडून ६ गायी मृत्यूमुखी ...!



संगमनेर । प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):-
पारेगाव येथे विजेची तार पडून ६, गायांचा मृत्यू  झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ वाटत आहे.

यामध्ये फकीरा राधु गडाख, रा. पारेगाव गडाख येथील हा शेतकरी या शेतकऱ्याच्या ६ गायींवर विजेची तार पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. महावितरणची तार गोठ्याच्या जवळून गेली होती. पावसाळा सुरू होताच अशी घटना घडली आहे .

अशी घटना अजून घडू नये म्हणून महावितरणने सगळीकडे  प्राधान्य पुर्वक लक्ष द्यावे  अशी स्थानिक लोकांची मागणी होत आहे , तर ,फकीर राधू  गडाख , या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आता याची भरपाई कोण देणार ..? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. हा शेतकरी मात्र आता संतापलेला आहे व तो आपल्या नुकसानभरपाईची मागणी करत आहे...!

तरी शासनाने अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडे वेळीच लक्ष दिले तर त्यांना दिलासा मिळू शकतो. अशी अपेक्षा सर्व सामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
close