shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समतेचा क्रांतीदुत प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व. "तेरावे सद्दीची पैगंबरी खुप ! दावीतो प्रमाण कुराणातं !!


 जगी स्री पुरुष सत्यधर्मी होती !
   आनंद वतनी ज्योती म्हणे !! "  समतेचे पुरस्कर्ते " महात्मा ज्योतिरावजी फुले .
     "  एक ही सफमें खडे हो गयै , मेहमूद और अयाज ..!
ना कोई बंदा रहा ,ना बंदा नवाज. .!!"
जगप्रसिद्ध साहित्यिक  ऊर्दू कवी डॉ.मुहम्मद इक्बाल सहाब.

    इतिहासाच्या कित्येक महान व्यक्तींनी ज्या महामानवाच्या कार्या , जीवनाविषयी ,  सामाजिक एकता विषयावर , क्रांतिकारक निर्णयावर /कित्येकदा स्तुती केली ,ज्ञात -अज्ञातपणे आपल्या कार्यात त्यांच्या विचारांचा अंगिकार करून आदर्श घेतला.
आशा  महामानवाची आज जयंती व पुण्यतिथी सुध्दा.
  मी लिहीताना स्वतः निरक्षर असून  ,अनाथ ,  विधवा , महिलांसाठी संवेदनशील  , साक्षरतेचे व समतेचा पुरोगामी प्रेषित मुहम्मद  सल्लमांचां उल्लेख करतो.
त्याचप्रमाणें पुरोगामी विचारांचे धगधगत्या मशाली चे महामानव च करतो . त्यांच्या पुरोगामी विचारांनी प्रभावित होऊन कित्येक संत ,पीर , बादशहा ,महान विचारवंत , विद्वान , समाजसुधारक या महात्म्यांनी आप- आपल्या देशात समाजात  ज्ञात , अज्ञात पणे क्रांती घडवून आणली .
       १५०० वर्षांपूर्वी पारंपरिक  वादातून धर्माची सुटका करून लोकांना एक ईश्वर वअल्लाहा ची शिकवण देवून , फक्त  "  एकच  अल्लाहा - ईश्वर समस्त ब्रम्हांडाचा नायक  आहे ", एकाच अल्लाहा ची प्रार्थना-बंदंगी भक्ती करा , अल्लाहाची   प्रार्थना करताना अनुयायींना थेट संपर्क साधण्यासाठी कोणत्याही प्रकारे मधे दलाल मुक्त धर्माची संकल्पना मांडली.सोबतच कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही .
  इस्लामी संस्कृती नुसार कोणत्याही  प्रकारची साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची गरज ठेवली नाही . 
   कोणही व्यक्ती ,मग शुद्र ही असेल ती सुध्दा  इस्लामी ज्ञान घेवू शकते अलिम ,मौलाना , मुफ्ती , हाफीज  होऊन शिक्षण घेवू शकतो,ठराविक जातीत जन्माला आला तरच तुम्ही  शिकण घेवु शकतात आसा पारंपरिक वाद त्यांनी एकदम नाकारला. शिक्षण ज्ञान घेणाऱ्या व्यक्तींना प्रेषित मुहम्मद  सल्लमांनी मोठे स्थान दिले आहे , एक विद्वान एका शहीदांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे ,हा विचार त्यांनीच दिला आहे ,  ईस्लाम मधे एका शहीदांचे फार मोठं महत्त्व आहे , तरी सुद्धा त्यांनी विद्वानांना जास्त महत्त्व दिले , त्यावेळी भरपूर युद्ध होत होती युध्दातील बंदी केलेल्या शिक्षित सैनिकांना शिक्षा म्हणून समाजातील मुलांना शिक्षण देण्याची कामे शिक्षा म्हणून दिले होती. मग ते कोणत्याही प्रकारचे  उदा. ज्ञान असणारा व्यक्ती म्हणजेच विद्वान फक्त धार्मिक ज्ञान असणं च हे ज्ञान ईस्लाम मानत नाही तर उदा. अर्थशास्त्र, रसायन, वैद्यकीय , क्रीडा , लष्कर  ईत्यादी विविध क्षेत्रातील उपेक्षित वंचित समाजासाठी ज्ञानाची बंद कवाडे प्रेषित स्व.मांनी सर्व मानवजातीला कायमची अगदी खुली केली .
त्याकाळी चीन हा जगातील आजच्या प्रमाणेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खुप प्रगत देश होता तेथील अतिप्रगत ज्ञान मिळवण्यासाठी " तुम्ही चीनला जावुन ज्ञान घ्यावं लागलं तरी तुम्ही ज्ञान घेण्यासाठी  चीनलाही जा "   त्याकाळी असा पुरोगामी दुर-दृष्टीकोनाबददल प्रेषित मुहम्मद  सल्लमांचा अभिमान बाळगावा तितके थोडेच.
     श्री.  गुरु नानक देवजी , आपल्या (जन्म साखी विलायत वाला ,पेज नंबर १६८) ) मधे म्हणतात की,  " ले पैगंबरी आया , इस दुनिया माहे ! नाऊ .
                 मोहम्मद मुस्तफा ,हो आबे परवा हे !!!!)
( अर्थात , ज्यांचं नाव मुहम्मद आहे ,ते या जगात प्रेषित बनुन आलेले आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकाच्या शैतानी शक्तींची भिती व भय नाही .ते बिलकुलच निर्भय  आहेत .)
  अल्लाह समोर सर्व मानव सम-समान, सारखेच आहेत हा पुरोगामी विचार मांडला .
 आपल्या ज्ञानाच्या जोरावर कोणी कितीही मोठा होवू  शकतो , कोणीही राजा ,प्रधान बनू शकतो हा अत्यंत पुरोगामी विचार मांडला .राजा होण्यासाठी फक्त राजाच्याच पोटी जन्माला यावा लागतो हा विचारच नाहीसा करून टाकला व आपल्या कृतीतून दाखवून देत . याचे मुर्तीमंत उदा. म्हणजे  महाराष्ट्रातील अहमदनगर व औरंगाबाद शहरांची ज्याने निर्मिती केली, शहर बसवले, चेहरा- मोहरा बदलला असे पंतप्रधान एक निग्रो गुलाम म्हणून विकत आणला होता व आपल्या कर्तृत्वाने मोठ्या पदावर गेले ते अर्थात मलिक अंबर होत .(उदा. त्यांच्या महानिर्वाण नंतर ७००-८०० वर्षानंतर चे आहेत ).
   समतेचा संदेश देणारे पहिले क्रांतिकारक व आचरणातून आणणारे प्रेषित मुहम्मद स्व.मच ,आपल्या २३ वर्षांच्या कालावधीत समतेवर आधारित समाजरचना निर्माण करून , अरब देशात काळा -गोरा  हा भेदभाव खुप मोठ्या प्रमाणात होता , काळया गुलामांची खरेदी- विक्री खुप प्रमाणात  केली जात होती ,ती  गुलामगिरी नष्ट करून एका जैद नावाच्या काळया गुलामाचा आपल्या सख्ख्या आत्या बहीणाचा विवाह करून काळया -गोऱ्यांचा भेदभावच नष्ट केला .
ह.बिलाल नावाच्या तुच्छ समजले जाणारे गुलामगिरीतून मुक्त करून मक्का विजया दिवशी पवित्र काबागृहावर चढून " अजान " देण्याचा आदेश देऊन समस्त जगाला दाखवून दिले की , कोणीही अपवित्र नसते. समस्त मानव जात ही इस्लामी सिद्धांतानुसार एकाच अल्लाहाची संतान आहेत. सर्व रंगाचे , वर्णाचे , वंशाचे ,एकच आहेत .हा भेदभाव ईस्लाम मुळापासून नष्ट करतो. सर्वांना समान न्याय , हक्क , संधी आहेत , क्रांतिकारी विचार पहिल्यांदा प्रेषित मुहम्मद स्व.मानी जगाला दिला.
   स्वामी विवेकानंद म्हणतात ,""' प्रेषित मुहम्मद पैगंबर स्व.आपल्या आदर्शवत जीवनात असं काही धडा घालून गेले की , त्यांच्या अनुयायांनी , मुस्लिमांमध्ये संपूर्ण समता , बंधुभाव निरंतर नांदावयांस हवे , त्यांच्या मधे जातीचा , लिंगाचा , वर्णभेदाचा भेदभाव कदापी ही शिरू नये."

लेखन:- *डॉ. सलीम सिकंदर शेख*
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर - *9271640014*
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close