जागतिक पातळीवर कर्करोग हा दोन नंबरचा जीवघेणा आजार आहे .दरवर्षी साधारणतहा दहा दसलक्ष मृत्यू कर्करोगामुळे होतात,म्हनजेच 26300 मृत्यू रोज व हा आकड़ा 2030 पर्यन्त 13 दसलक्ष पोहचू शकतो . दरवर्षी साधारणतहा 20 दसलक्ष कर्करोगाची नविन लागण होते . साधारणपणे 10 % कर्करोग जनुकांच्या बदलामुळे तर 27 % कर्करोग हे टाळता येण्या सारख्या व्यसनामुळे म्हणजेच तंबाखू , दारू यामुळे होतात .भारतात याचे प्रमाण इतर देशापेक्षा जास्त आहे .
राष्ट्रीय कर्करोग नोंदणी संख्येवारी नुसार 2022 साली भारतात 14,61,427 कर्करोग रुग्णांचे निदान झाले म्हणजे 100 रुग्ण प्रति लाखामागे व संख्याशास्रा नुसार 2025 मधे यात 12.8 % वाढ होऊन रुग्णसंख्या 1.57 दसलक्ष होऊ शकते .भारतामधे प्रतयेक 9 वी व्यक्ति आयुष्यभरात केव्हाही कर्करोग ग्रस्त होऊ शकते .
पुरुषामधे फुफुँसाचा कर्करोग तर स्रियामधे स्तनाचा कर्करोग सर्वात जास्त आढळतात .हे रुग्ण बऱ्याचदा पुढच्या टप्प्यात आजार गेल्यावर निदर्शनास येतात . 57 % स्तनाचे कर्करोग रुग्ण , 60% गर्भाशयाच्या मुखाचे कर्करोग रुग्ण ,मान व डोक्याचा कर्करोगाचे रुग्ण 50 % हे बऱ्याच पुढे गेलेल्या अवस्थेत दवाखाण्यात येतात . हे सगळी आकडेवारी बघता UICC या कर्करोगावर काम करणाऱ्या संस्थेने 2000 सालापासून जागतिक कर्करोग दिवस पाळण्याचे संकेत दिले आहेत .यामुळे जागृती , शैक्षणिक जाणिव , शासकिय व अशासकीय पातळीवर दखल घेऊन लक्षावधी लोकांचे प्राण लवकर निदान व उपचार करुन वाचवता येतील व टाळता येतील यासाठी प्रयत्नशील आहे . UICC संस्थेने Close the Care Gap अर्थात काळज़ी अंतर बंद करा हा नारा पुकारून काम सुरु ठेवले आहे व 2024 हे वर्ष तिसरे व अंतिम वर्ष असणार आहे .
इंडियन मेडिकल एसोसिएशन व जागतिक आरोग्य संघटना यांनी संयुक्त पणे 2030 पर्यन्त गर्भाशय कर्करोग दूर करा यासाठी लढा पुकारला आहे . आए एम ए संघटने तर्फे प्रतिबन्ध , निदान व उपचार यावर भरीव काम सुरु केले आहे .
भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे स्रियात व पुरुषात असणाऱ्या कर्करोगत सर्वात जास्त आहे .साधारणतहा 13.5%. यासाठी छाननी शिबिरे , जाणीव जागृती व लवकर निदान अत्यंत महत्वाचे आहे .
आय एम ए या संघटनेने कर्करोगाबाबतची जोखिम कमी करण्यासाठी खालील गोष्टी दैनदिन आचरणात आणाव्यात अशा सुचना केल्या आहेत कारण कर्करोग हा दैनदिन सवयी , राहणीमान व निसर्गाशी नाते तोडल्या गोष्टीमुळे होणारा आजार आहे .
खालील गोष्टी आचरण्यात अनाव्यात :
1. आरोग्यदायी आहार
2. . हालचाल व चपळता
3. तम्बाखू व दारू पासून मुक्ती
4. एस्बेस्टॉस ,जंतु नाशके आदि प्रदुषण करणाऱ्या घटकापासून अलिप्त
5. एच् पी वी लसीकरण
6. तृणधान्ये , पालेभाज्या , फळे व बियांयुक्त आहार
7. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ , लाल मांस , साखर व गोडी वाढवणाऱ्या पदार्थापासून दूर
8. कर्करोगाबाबतच्या प्राथमिक लक्षणांची माहिती व जागृती
आए एम ए संघटनेद्वारे सतत जागृती शिबिरे , माहिती पत्रके , चर्चासत्रे ,वर्तमान पत्रातून लेख , आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण या गोष्टीद्वारे सातत्याने प्रबोधन चालू आहे .
"चला तर कर्करोगमुक्त भारत स्वप्न साकारु या ".
*डॉ.रवींद्र कुटे*
मा.अध्यक्ष : आय एम ए. महाराष्ट्र
*संकलन :*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

