संगमनेर / प्रतिनिधी:
तालुक्यातील निमज येथील सरस्वती ग्रामीण बिगर शेती पतसंस्था यांच्यावतीने निमज येथील शेतकरी कुटुंबातील सौ सुजाता बाबासाहेब कासार यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल व निमज गावचे सुपुत्र तुषार शांताराम डोंगरे यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संगमनेर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शरद गोरडे व सदर समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अतुलजी कासट यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
संबंधित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष वैभव लांडगे व भाजपचे शहराध्यक्ष श्रीरामजी गणपुले यांच्या शुभहस्ते तसेच जनसेवा संगमनेरचे अध्यक्ष तथा भाजपचे तालुकाउपाध्यक्ष साहेबरावजी वलवे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपकजी भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रसंगी गणपुले साहेब यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी नेट किंवा सेट परीक्षा देतात त्यापैकी एक-दोन टक्के विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होतात सौ सुजाताताई यांनी अकोले महाविद्यालयात प्राध्यापिकेचा जॉब करत असताना व कुटुंबातील जबाबदारी पेलवत असताना अथक परिश्रम घेऊन व अभ्यास करून संबंधित परीक्षा पास केली आणि त्यात निमज गावातील पहिली सेट परीक्षा पास असलेली महिला प्राध्यापिका म्हणून बहुमान मिळवला त्यासाठी आजचा कार्यक्रम हा खूप महत्त्वाचा आहे. त्यांना संबंधित कुटुंबाने विशेषता त्यांचे पती ,सासू-सासरे यांनी जो सपोर्ट केला तो खऱ्या अर्थाने आदर्शवत आहे. सुजाताईंनी आपल्या अनुभवाचा व अभ्यासाचा उपयोग निमज गावातील जास्तीत जास्त मुलींना या क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.हे सांगतानाच तुषार डोंगरे याने अथक परिश्रम करून राज्य राखीव पोलीस दलामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले व ह
यश संपादन केले त्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. आई-वडिलांनी आपल्या काळजावर दगड ठेवून मुला-मुलींना देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पाठवणे ही खूप धाडसाची गोष्ट आहे आणि या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांमुळेच आपण इकडे सुरक्षित आहोत याचा आवर्जून उल्लेख केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे संगनेर समितीचे अध्यक्ष शरद गोरडे यांनीही सत्कार केल्याबद्दल निमज ग्रामस्थ व सरस्वती पतसंस्था संचालक व सभासद या सर्वांचे आभार मानले. निमज मधिल जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे व शासनाच्या योजनेचा फायदा घ्यावा त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते गावातील ज्येष्ठ भाजप नेते शशिकांत मतकर यांच्या माध्यमातून करू असे आश्वासन दिले. अध्यक्ष भाषणात वैभवराव लांडगे यांनी महायुती शासनाच्या विविध लोक उपयोगी योजना सांगतानाच भाजप शासन हे शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, तरुण, छोटे व्यवसायिक, उद्योगपती यांच्यासाठी भविष्याचा बदल किंवा भविष्यात येणारे आव्हाने या सर्वांचा विचार करून आमुलाग्र बदल करण्यासाठी कसे काम करत आहे याची माहिती सर्वांना दिली. सौ सुजाता ताई कासार यांनी आपल्या भाषणात भाषणात माझ्या सासूबाईंनी मी ही परीक्षा पास व्हावी किंवा त्यासाठी अभ्यास करावा यासाठी खूप असा सपोर्ट केला हे सांगतानाच त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले, माझे पती दोन-तीन वर्षांपूर्वीच नेट परीक्षा पास झालेले असताना व माझा दोन-तीन वेळा संधी हुकलेली असतानाही माझे कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे आजचे हे यश मी माझ्या कुटुंबाला समर्पित करते असे सांगितले. प्रसंगी आभार प्रदर्शन संस्थेचे सभासद व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले साहेबरावजी वलवे यांनी दोघांनाही यश मिळवल्याबद्दल अभिनंदन करतानाच संस्थेच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे संबंधित कार्यक्रम घडवून आणणाऱ्या संस्थेचे चेअरमन व्हा.चेअरमन संचालक व सर्व सभासद ग्रामस्थांचे आभार मानले. सूत्र संचालन काशिनाथ डोंगरे यांनी केले.
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111