...
अहिल्यानगर (११-एप्रिल):- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा सन्माननीय मा.श्री.बच्चूभाऊ कडू साहेब(मा. राज्य मंत्री, महाराष्ट्र शासन) यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिंधीच्या घरासमोर शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव तसेच दिव्यांग बांधवांना ६०००/- मासिक अनुदान द्यावे या मागणीसाठी मशाल मोर्चाचे आयोजन केलेले होते. त्यास शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेने पाठिंबा जाहीर केला होता, प्रहार तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्वच सदस्य तसेच पदाधिकारी यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सहभाग नोंदवत शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी रात्री १२.००वाजता सर्वच लोकप्रतिनिधींना मशाल मोर्चाद्वारे निवेदन दिले.
प्रहार चे प्रमुख मा.श्री.बच्चूभाऊ कडू(मा.राज्यमंत्री) यांचा मोर्चा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर धडकला तर प्रहारचे तालुकाध्यक्ष प्रदिप थोरात आणि शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे पाटील असंख्य कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसह संगमनेरचे विद्यमान युवा आमदार अमोल खताळ पाटील यांच्या घरासमोर मशाल मोर्चा सुरू झाल्यानंतर तात्काळ निवेदन स्विकारत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन देत आंदोलकांचे शेतकऱ्यांच्या/दिव्यांगाच्या जिवंत आणि ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडत असल्याबद्दल अभिनंदन देखील केले.