निवडणुकीपूर्वी सत्तेत येण्यासाठी पक्षप्रमुखांनी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले सरकार स्थापन होऊन शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्याचबरोबर शेतकऱ्याची सध्याची स्थिती अत्यंत वाईट असून शेतकरी कर्जे माफी न झाल्यास होणाऱ्या आत्महत्या देखील वाढण्याची विदारक परिस्थिती आंदोलकांनी आमदारांना सांगितले. यावेळी आंदोलकांना सामोरे जाताना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी सांगितले की मीं देखील आपल्या मताशी सहमत आहे आपले निवेदन आणि भावना मी पक्षश्रेष्ठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मांडणार आहे. नेवासा मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्या व निवेदनातील मागण्या विधानसभेत उपस्थित करणार आहे असे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्याची निवेदन स्वीकारले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, युवक जिल्हाध्यक्ष ऍड. पांडुरंग औताडे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक जालिंदर आरगडे, करजगाव चे सरपंच अशोक टेमक, युवक जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाखरे, अरविंद आरगडे, युवक तालुकाप्रमुख विकास कोतकर, शहराध्यक्ष विशाल शिरसाठ,तालुका उपप्रमुख पांडुरंग नवले, संघटक अमोल जोगदंड, शाखाप्रमुख सोमनाथ सांगळे सोशल मीडिया प्रमुख आदिनाथ नवले, सतीश विधाटे, प्रवीण विधाटे, प्रहार सैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.