shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गाता रहे मेरा दिल, स्वरछंद ग्रुप व मख़दुम सोसायटी तर्फे कर्तुत्वान महिलांचा सन्मान


इतरांच्याही जीवनात सुख, शांती यावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे - डॉ. कमर सुरुर

नगर /;प्रतिनिधी:
आज समाजामध्ये जो तो स्वत:च्या जीवनामध्ये सुख शांती यावी  यासाठी झटत आहे.परंतु सामाजातील इतरांच्याही जीवनात सुख शांती लाभावी यासाठी धडपड करणारी माणसे ही हल्ली फारच कमी प्रमाणात बघावयास मिळतात. उपेक्षित आणी दुर्लक्षित अश्या दुर्बल घटकांसाठी त्यांच्या जीवनात सुख शांती व समृद्धी आणण्यासाठी समाजातील सर्वांनी काम करण्याची आज केवळ आवश्यकताच नव्हेतर नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सहसचिव व आंतरराष्ट्रीय शायरा डॉ. कमर सुरुर यांनी केले.

         गाता रहे मेरा दिल ग्रुप, स्वरछंद ग्रुप व मखदूम सोसायटीच्या वतीने नगर शहरातील कर्तृत्ववान  महिलांचा सन्मान नगर शहराच्या सावेडी परिसरातील माऊली सभागृहात करण्यात आला या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी स्मिताताई पानसरे, सुफी गायक पवन नाईक, उर्जिता  फाउंडेशनच्या संध्याताई मेढे, जागरूक नागरिक मंच चे सुहासभाई मुळे, रहमत सुलतान फाउंडेशनचे युनुस भाई तांबटकर, हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संजय सपकाळ, संगीतप्रेमी अमृत मुथा, एडवोकेट रवींद्र शितोळे, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, एडवोकेट संतोष गायकवाड, मुस्कान असोसिएशनचे शफकत सय्यद, राजकुमार गुरनानी, ऍड.अमीन धाराणी, शिल्पकार विकास कांबळे, सुनंदा तांबे,ऍड. गुलशन धाराणी, डीसीबी बँकेचे सुरज सय्यद, नागेबाबा मल्टीस्टेटचे श्री. कदम, संजय गाडे, सेलिंग किचन चे राहुल कुकरेजा आदी मान्यवर उपस्थित होते.

       पुढे बोलताना डॉ. कमर सुरुर म्हणाल्या की,समाजात नेहमीच पुढे पुढे राहणाऱ्या लोकांचा व फक्त आपल्याच नाव आणी चर्चेसाठी काम करणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सन्मान होत असतो. परंतु जे खऱ्या अर्थाने मनाने समाजात वंचित, दुर्बलांचं विकास व्हावा या भावनेतून काम करत असतो अशा निरपेक्ष समाजसेवा करणाऱ्या महिलांचा सन्मान या ग्रुप तर्फे करण्यात आला ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले. 
   
       यावेळी उपेक्षित वंचित आणी दुर्लक्षित दुर्बलांसाठी नेहमी कार्य करणाऱ्या अलका मुंदडा,रजनी मनोज भंडारी, राजश्री शितोळे, ऍड. मनिषा केळगंद्रे - शिंदे, शबाना शेख, भारती शेवंते, भावना केदार, रेश्मा आठरे, जागृती ओबेरॉय, रचना काकडे - तौर, ऍड.स्वाती जाधव, सलोनी जाधव, रविना कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुस्तक, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या सन्मानार्थींच्या सन्मानार्थ सुरेल गीतांची महफील आयोजित करण्यात आली होती,यामध्ये नगर च्या हौशी कलाकारांनी रसिकांना आपल्या स्वर व गीतांनी मंत्रमुग्ध केले. प्रत्येक सन्मान व गीतांना रसिकांनी वाह... वाह.. व टाळ्यांच्या गजरात दाद दिली. 
या कार्यक्रमासाठी संध्याताई मेढे, राजकुमार गुरनानी व आबीद दुलेखान यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपा माळी व विजय माळी यांनी केले. तर आभार आबिद खान यांनी मांनले. कार्यक्रमास नगर येथील सामाजिक कार्यकर्ते व संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 9561174111
close