काळ सरतो, ऋतु बदलतात, पण समाजासाठी निःस्वार्थ भावनेने केलेली सेवा कधीच मरत नाही. वडार समाजाच्या प्रत्येक बांधवाच्या मनात आजही ज्यांचे विचार दीपस्तंभासारखे प्रकाशमान आहेत, ते म्हणजे डॉ. देगलुरकर साहेब!
त्यांचे कार्य हे केवळ समाज उभारणीपुरते मर्यादित नव्हते; त्यांनी समाजाला स्वाभिमान, आत्मविश्वास आणि एकतेची ताकद दिली. समाज रक्षणाची मशाल पेटवून त्यांनी वडार बांधवांना उभारी दिली. त्यांच्या कार्याची ही परंपरा आपण सर्वांनी एकत्र येऊन कायम ठेवणे हेच त्यांच्या जयंतीनिमित्त खरे अभिवादन ठरेल.
आज आपण संकल्प करूया—
🔹 एकजुटीने राहण्याचा!
🔹 समाजाचा विचार करणाऱ्या खऱ्या सेवकांचा सन्मान करण्याचा!
🔹 स्वार्थी आणि समाज भक्षक प्रवृत्तीपासून दूर राहण्याचा!
डॉ. साहेबांचे नाव आणि विचार हे केवळ स्मरणातच नाही, तर कृतीतूनही जिवंत ठेवणे हीच खरी कृतज्ञता!
🙏 त्यांच्या कार्याला आणि विचारांना शतशः वंदन! 🙏
आपला,
अंकित बाहेती

