ऑनलाईन फसवणूक, बनावट लिंकपासून बचावाचे पोलीस अधिकाऱ्यांकडून थेट मार्गदर्शन.
“डिजिटल युगात सायबर सुरक्षितता ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी सजग राहणे अत्यावश्यक आहे.”
— डॉ. विजय शास्त्री, प्राचार्य
एरंडोल | दि. ८ जानेवारी —
शास्त्री फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सायबर क्राईम विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. एरंडोल पोलीस ठाण्यातील ललित नारखेडे व दीपक राजपूत यांनी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रकार, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक, सोशल मीडियाचा गैरवापर तसेच ओटीपी व पासवर्ड सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
प्रत्यक्ष घडलेल्या घटनांच्या उदाहरणांमधून सायबर गुन्हे कसे घडतात व त्यापासून कसा बचाव करता येईल, हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सायबर गुन्ह्याची शंका आल्यास १९३० हेल्पलाईनवर तात्काळ तक्रार करावी व cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अनुप कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रा. सुमेश पाटील यांनी मानले. प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर क्राईमविषयी सजगता वाढल्याचे चित्र दिसून आले.




