राहुरी (ब्राम्हणी): आधीच कोरोना संकटाच्या सावटाखाली असलेल्या ब्राह्मणीकरांना आता चोरट्यांच्या दहशतीने ग्रासले आहे . काल रात्री चोरट्यांनी येथील अनेक दुकानांचे शटर कटावणी च्या साह्याने उचकटून दुकानातील सामान व काही रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे. गावात आधीच कोरोमा ची दहशत व आता चोरांची दहशत यामुळे येथील व्यावसायिक मात्र पूर्णतः दहशतीखाली गेले आहेत.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून गावातील संपूर्ण व्यवसाय व पूर्ण गाव बंद करण्यात आले आहे. मात्र रात्री झालेल्या चोऱ्यांमुळे येथील व्यवसायिक मात्र चांगलेच भेदरलेले आहेत. राहुरीचे कर्तव्यदक्ष समजले जाणारे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी स्वतः या प्रकरणी त्वरित व सखोल लक्ष घालून या चोरट्यांचे मुळे जाळे उखडून काढून त्यांना त्वरित जेरबंद करावे. अशी कळकळीची मागणी येथील व्यवसायिकांतून होत आहे.

