shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माढा मतदारसंघातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ४ कोटी ५३ लाख कर्ज माफी ;चार दिवसांत खात्यावर रक्कम जमा होणार.माढ्याचे आ. बबनराव शिंदे यांची माहिती

टेंभुर्णी । प्रतिनिधी :
मागील वर्षी माढा मतदारसंघातील माढा पंढरपूर  माळशिरस तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे भिमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने जाहीर केलेल्या कर्ज माफीसाठी पात्र ठरलेल्या ६६६ शेतकऱ्यांची एकुण ४ कोटी ५३ लाख  कर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहीती माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

मागील वर्षी माहे जुलै व ऑगस्ट मध्ये सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली होती. या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे माढा मतदारसंघातील माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील ४३ गावांना या पुराचा फटका बसून शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते  या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आमदार बबनराव शिंदे यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत मदत देण्याची मागणी शासनाकडे केली होती. बाधित शेतकऱ्यांना  आघाडी सरकारने संबंधित पुरग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यासाठी योजना जाहीर केलेली  होती. गतवर्षीच्या महापुरात नुकसान झालेल्या पुरग्रस्त शेतक-यांच्या  कर्जमाफीची रक्कम शासनाकडून प्राप्त झालेली आहे येत्या चार दिवसांत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल अशी माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

यामध्ये माढा तालुक्यातील १२ गावातील १८२ पुरग्रस्त शेतकऱ्यांना रू.१ कोटी १६ लाख २० हजार ४३ इतक्या कर्ज माफीचा लाभ मिळालेला असून रक्कम  शेतकऱ्यांची खाती असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीय बँक, व्यापारी बँक यामध्ये खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पुर्ण झालेली आहे  त्यामध्ये बेंबळे, मिटकलवाडी, रूई, आलेगांव(बु), रांझणी, वडोली, चांदज, आलेगाव(खु), टाकळी(टे), माळेगांव, शेवरे, गारअकोले  तसेच  पंढरपूर तालुकयातील २२ गावातील ३०६  पुरग्रस्त शेतकऱ्यांना रू.२ कोटी १६ लाख २४ हजार ७१४ इतकी कर्ज माफी मिळालेली असून त्यामध्ये अजनसोंड, देगांव, शेगांवदुमाला, सुस्ते, सांगवी, खेडभोसे, भोसे(तरटगांव), पेहे, उंबरे(पागे), करोळे, कान्हापूरी, पिराची कुरोली, वाडीकुरोली, चिंचोली(भो), गुरसाळे, भटुबंरे, बादलकोट, ईश्वरवठार , व्होळे, नांदोरे, देवडे, पट.कुरोली  व माळशिरस तालुक्यातील ९ गावातील १७८ पुरग्रस्त शेतकऱ्यांना  रू. १ कोटी २० लाख ७९ हजार  इतकी कर्ज माफी मिळालेली असून त्यामध्ये लवंग, वाघोली, मिरे, नेवरे, उंबरे(वे), महाळूंग, जांभूड, वाफेगांव, खलवें  या गावांतील पुरग्रस्त शेतकऱ्यांची  कर्जमाफी होणार आहे.

संबंधित पुरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा याबाबत मी फेब्रुवारी २०२० मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सुचना उपस्थित करून मदत देण्याची मागणी शासनाकडे केलेली होती. त्यानुसार अतिवृष्टीने बाधीत शेतक-यांनाही कर्जमाफीचा फायदा देण्यासाठी शासनाकडून निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले होते. शासनाकडून दिलेल्या आश्वासनाची पुर्तता झाल्यामुळे माढा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी १५ कोटी रूपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
-आ.बबनदादा शिंदे
close