इंदापूर प्रतिनिधी ( तात्याराम पवार)
बावडा: १५ डिसेंबर २०२०. रोजी समाज भूषण व भारतीय चिकित्सा रत्न डॉक्टर लक्ष्मण असबे यांनी आज लिहिलेल्या लेखनात वरील विधान करून पुढे म्हणाले की, आपल्यावर होत असलेला अन्याय माणूस क्षमतेपेक्षा जास्त सहन करू शकत नाही.
*सहनशीलतेलाही सीमा असते*,
आपलीच माणसे ज्यावेळी आपल्याच माणसांवर अन्याय करू लागतात , त्यावेळी
या वेदना असह्य असतात .
आपला शत्रू संधी साधून आपल्यावर वार करणार आहे , अन्याय करणार आहे , ही मानसिकता आपली आपोआप असते . त्यामुळे
शत्रूने किंवा परक्याने अन्याय केला
तर त्यांना ते अनपेक्षित नसते, त्यामुळे
ते सहन करण्याची आपली मानसिक असते.
🌚🌚🌚🌚🌚🌚
ज्यांना आपण आपले मानलेले आहे,
ज्यांच्यासाठी आपण कष्ट घेतलेले आहेत,
_ती माणसे ज्यावेळी अन्याय करू लागतात त्यावेळी ते सहन करण्याची आपली मानसिक तयारी नसते_.
*अशावेळी आपल्या शत्रू पेक्षा जास्त राग आपल्याला आपल्या माणसाचा येतो , मग त्या अन्यायाच्या विरोधात आपण बंडखोर बनतो आणि त्याच्यावर मात करण्यासाठी कोणाचीही मदत घेण्यास आपल्याला गैर वाटत नाही .*
आज अशीच काहीशी अवस्था
शेतकऱ्यांची झालेली आहे .
_विरोधात असताना शेतकऱ्यांचे कैवारी बनून , शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारी माणसे ज्यावेळी सत्तेच्या खुर्चीत बसतात त्यावेळी शेतकऱ्यांचे इतके कट्टर वैरी कशी बनतात ⁉️ हे एक भारतातील नागरिकांना न उलगडलेले कोडे आहे_ .
आज शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीन मदत करतोय असे बेताल वक्तव्य काही जबाबदार नेते करत आहेत.
त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल तर ,
⁉️असे का घडतेय ⁉️
याचा विचारही त्यांनी करावा .
_आपणच आपल्या माणसावर सतत अन्याय करू लागलो, तर त्याच्याविरुद्ध बंड करताना शेतकरी कोणाचीही मदत घ्यायला प्रवृत्त होईल, असे आपल्याला वाटत नाही का ⁉️_
*सतत अन्याय करूनही शेतकऱ्याने कधीही आपल्या समाजाशी आणि राष्ट्राशी गद्दारी केली नाही*.
भारताच्या इतिहासात शेतकऱ्यांनी गद्दारी केलेले एकही उदाहरण सापडणार नाही . नेत्यांनी , उद्योगपतींनी राष्ट्राशी गद्दारी करून परदेशी बँका भरल्याची अनेक उदाहरणे इतिहासातही आहेत आणि वर्तमानातही आहेत .
*अशा लोकांनी शेतकऱ्यांना गद्दार ठरविणे म्हणजे पतिव्रतेला वेश्या ठरविण्यासारखे आहे* .
↘️निसर्गाची अनियमितता,
↘️ सरकारी धोरणाची अनिश्चितता,
↘️व्यापारी , भांडवलदार आणि मजूर
यांनी चालू केलेली लूट व
↘️ शेतकऱ्यांचे नेते, लोकनेते म्हणून
निवडून गेलेले पुढारी ,
यांनी केलेली अवहेलना , यामुळे
*भारतातील शेतकरी कमालीचा अस्वस्थ आणि अन्यायग्रस्त झालेला आहे*.
बंड करण्यासाठी सर्वच बाजूंनी त्याला पोषक वातावरण बनलेले आहे .
अशा स्फोटक परिस्थितीत लोकनेत्यांनी त्यांना आपुलकीने आणि प्रेमाने हाताळले पाहिजे . अन्यथा सहनशीलतेचा अंत होईल आणि *भारतातील शेतकरी हा जो मरणारा बनलेला आहे, तो मारणारा बनायला वेळ लागणार नाही*.
_सर्व मार्ग संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांनी हातात शस्त्र घेतले, तर त्याला जबाबदार शासन आणि प्रशासन दोघेही असणार आहेत_.
↘️कृषिप्रधान असलेल्या भारत देशात
रक्ताच्या नद्या वाहतील .
↘️ महासत्ता होण्याची क्षमता असणारा भारत, आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांवर केलेल्या अन्यायामुळे रसातळाला जाईल .
↘️बंड करण्यासाठी भारतातील शेतकऱ्यांना कोण्या परक्याच्या मदतीची गरज लागणार नाही .
↘️ त्याच्या अंगात क्रांतिकारकाचे रक्त आहे याचे भान प्रत्येक नेत्याला असायला हवे .
🕎🕎🕎🕎🕎🕎
✒️ *_डॉ.आसबे ल.म._*✒️
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
🕎🕎🕎🕎🕎🕎
मो.नं. *9822292713*.

