इंदापूर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व : राज्यमंत्री भरणे..!!
इंदापूर प्रतिनिधी:(१८ जाने.२१)तालुक्यातील ३६ ग्रामपंचायती वरती राष्ट्रवादीचे वर्चस्व असून पाच ते सहा ग्रामपंचायती संमिश्र झाल्या असल्याचा दावा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे. मात्र, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना निधी कमी पडून देणार नाही, असंही भरणे म्हणाले. सर्वात जास्त सरपंच ही राष्ट्रवादी काँग्रेसचेच होणार, असाही दावा भरणे यांनी केला.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ग्रामपंचायतीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना झटका बसला आहे. तर, भिगवणमध्ये विद्यमान मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गटाच्या हातून ग्रामपंचायतची सत्ता निसटली आहे.

