वालचंदनगर येथील महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत श्री वर्धमान विद्यालयचे ८ विद्यार्थी झळकले तर एका विद्यार्थ्यांने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत २५ वा येण्याचा बहुमान मिळवला .
प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर.
इंदापूर प्रतिनिधी: दि.८ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ ऑगस्ट, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याच्या गुणवत्ता याद्या आज परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली यामध्ये श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वालचंदनगर येथील महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत श्री वर्धमान विद्यालयचे ८ विद्यार्थी झळकले तर एका विद्यार्थ्यांने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत २५ वा येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्याबद्दल श्री वर्धमान विद्यालय मधील सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
( इयत्ता पाचवी )पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी:१)कु.पल्लवी परशुराम धापटे २४२.२)कु.अनुष्का पांडुरंग धापटे २२६.३)कु.सृष्टी राजेंद्र देसाई २२४.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री गवारी सर ,श्री शिवप्रसाद कुलकर्णी सर,श्री मोरे सर,श्रीमती वाघ मॅडम या शिक्षकांनी केले. तर( इयत्ता आठवी) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवंत विद्यार्थी:१)राघव गणेश लाळगे (राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत २५ वा) २५२.२)सार्थक काकासाहेब जाधव २१८.३)कु.खादिजा लियाकत शेख १९२.४)कु.ईश्वरी संदीप येवले १७८.५)अभिराज रंगनाथ रंगवाळ १६४. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सौ भगत मॅडम, सौ बर्गे मॅडम,सौ हिप्परकर मॅडम, सौ पांढरपट्टे मॅडम या शिक्षकांनी केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा समिती अध्यक्ष अमोल गेंगजे, प्राचार्य हनुमंत कुंभार सर, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी सर, उपप्राचार्य श्री अरुण निकम सर,पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे सर, माणिक पिसे सर

