शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. गुरूवार दिनांक ३१ मार्च २०२२
पत्रकार शिवाजी घाडगे यांचा दिल्लीत 'जल प्रहरी' पुरस्काराने सन्मान..!!
राहुरी : देशातील पाणी समस्या दुर करण्यासाठी योगदान तसेच जलसंरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेबद्दल पत्रकार शिवाजी घाडगे यांचेसह देशातील महत्त्वाच्या मान्यवरांचा 'जल प्रहरी' सन्मान देऊन भारताच्या जलशक्ती मंत्रालयाचे वतीने गौरव करणेत आला.
केंद्रीय जल मंत्रालय सचिव रजन गोयल ,जलपुरुष राजेंद्र सिंह,यांच्या हस्ते देशातील जल प्रहरी सन्मान देऊन सन्मानित करण्यात आहे बुधवारी ३० मार्च २०२२ रोजी नवी दिल्ली येथे केंदीय जलशक्ती मंत्रालयाच्या संयोगाने देशातील जल व्यावस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्ती जलप्रहरी सन्मान देऊन गौरवण्यात आले
"भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे वतीने पत्रकार शिवाजी घाडगे यांना जल प्रहरी पुरस्कार प्राप्त झाले बद्दल दिल्ली येथे भाजप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजू साहेब यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींची प्रतिमा भेट देऊन अभिनंदन केले. प्रसंगी, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस."*
"भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे वतीने पत्रकार शिवाजी घाडगे यांना जल प्रहरी पुरस्कार प्राप्त झाले बद्दल दिल्ली येथे खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांनी अभिनंदन केले प्रसंगी, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे नाना, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, पोपटराव शिरसाठ आदी."*
महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून राहुरीचे पत्रकार शिवाजी घाडगे यांचा सामावेश होता. ही नगर जिल्ह्यात माध्यम क्षेत्राला भुषणीय बाब होय. महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, पंजाब, राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलंगणा, अरुणाचलप्रदेश, आसाम, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, लडाख ,उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, दिल्ली येथील देशांतील विविध राज्यातील जल सरक्षण क्षेत्रात चांगले काम करण्यारया ३६ संस्था व व्यक्ती यांना जलप्रहरी देऊन सन्मानित करण्यात आला. शेतकरी, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, अधिकारी यांना जल प्रहरी देऊन गौरवण्यातआलें आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

