यावेळी शेतकरी संघटनेच्या पूजाताई मोरे यांच्या हस्ते नारळ फोडून गावाच्या शिवेतून ट्रॅक्टर पुढे कारखान्याला पाठवून दिला . यावेळी उपस्थित शेतकन्यांनी बघतोस काय रागाने ऊस घातलाय वाघान अश्या घोषणा दिल्या . तलवाडा येथील शेतकरी शेख खेजर म्हणाले की , माझी स्थानिक कारखान्याला नोंद असताना मागील ३ महिन्यापासून सतत संपर्क करूनही कारखान्याकडून तोड मिळाली नाही. त्याचवेळी कारखानदान्यांच्या पक्षात प्रवेश केला की बिगरनोंदीय उस ही कारखाना पान १ वर करत आहे .
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे . त्यात मुकादम एकरी दहा हजार रुपये घेतल्याशिवाय व तोड एक ते दीड हजार रुपये एका खेपेला द्यावे लागत आहेत . एवढं करूनही शेतकर्याचा ऊस कारखाना घेत नाही . ट्रैक्टर चालकाला किती रुपये दिले तरी ऊस नेत नव्हते . जयदेव शिंगणे यांनी याबाबत प्रयत्न करून सोलापूर येथील सिध्येश्वर करखानाची तोड सापडली आहे . त्यामुळे त्यांच्या येथील शेतकरी शेख खैसर व जयदेव शिंगणे सह तलवाडा गावातील शेतकऱ्यांनी ट्रैक्टर बाहेर काढताना आनंदाने वाजतगाजत गुलाल उधळून मिरवणूक काढली.

