अहमदनगर । प्रतिनिधी :-
अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अहमदनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD ) कार्यालयासमोर दि.२२ रोजी सद्बुद्धी सत्यनारायण व जागरण गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रहारच्या आंदोलनाच्या दणक्याने प्रशासनाला जाग आली असून उद्या दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे मा. जिल्हाधिकारी यांनी रस्ता सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बघुया जिल्हाधिकारी जिल्हा विकासासाठी काय निर्णय घेतात ..?

