जानेफळ । अनिल मंजुळकर . तुळजाई ॲग्रोटेक कंपनी व माय लाईफ मार्केटिंग च्या संयुक्त विद्यमाने जानेफळात सेंद्रिय शेतीचे कार्यशाळा पार पडली असून सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉक्टर केशव अवचार यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना सध्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा व केमिकलचा भडीमार केला जात आहे. त्यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. यामध्ये लहान वयात हृदयविकार. कॅन्सर किडनी स्टोन. अशाप्रकारे विविध शरीरावर होणारे परिणाम होत आहेत. सेंद्रिय शेती मध्ये शासनाचे विविध उपक्रम सुरू आहेत.
सर्व कृषी विक्रेत्यांना सेंद्रिय खताची दहा टक्के माल खरेदी व विक्री करावे आदेश देण्यात आले आहे. यावर्षी खरीप पिकामध्ये सेंद्रिय शेती करणार्या शेतकऱ्यांना फायदा झाला झाल्याने आणखी सेंद्रिय शेतीच क्षेत्र वाढणार आहे. खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी व आपल्या परिवारास विषमुक्त अन्न मिळाले पाहिजे . सेंद्रिय शतीला मागणी जास्त असल्याने सर्व शेतकर्यांनी सेंद्रिय शेती करावी असे आवाहन सुध्दा त्यांनी केले आहे. तुळजाई ॲग्रोटेक कंपनी मार्फत परिसरातील शेतकऱ्यांना माती परीक्षणाची सोय करण्यात येणार आहे. मोठमोठ्या फळबागा साठी सेंद्रिय शेतीची खते उपलब्ध आहेत. सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना तुळजाई ॲग्रोटेक कंपनी तर्फे क्रेडिटच्या माध्यमातून 30 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
ऍग्रो इंडिया कंपनीचे राहुल वाके अमरावती .भारत आघाव मेहकर उत्तम चव्हाण. प्रवीण कुमार कुंभारे. दिपक मिसाळ . सुभाष गदणे. यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदन कास्तकार संजय चांगाडे सह रामेश्वर सिरसाठ यांनी सेंद्रिय शेती केल्याने फायदा झाला आहे. असे शेतकरी बोलत होते. विदर्भात पहिला क्रमांक पटकाविणारे विदर्भ समृद्धी प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष संतोष साखरे. अमोल माडोकार. काळे याचा सत्कार करण्यात आला. तुळजाई ॲग्रोटेक कंपनीचे संदीप गायकवाड. अमोल गायकवाड नंदकिशोर निकस. उमेश चांदणे. भागवतराव माळेकर. गजानन फराटे मोळा. समाधान कृपाळ सर . राजू अवचार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.