shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ओझर टाऊनशीप लुंबिनी बुध्दविहारात वर्षावास करणाऱ्या बौध्दाचार्य व उपासकांचा तसेच संविधान बचाव रैलीचे स्वागत व सत्कार संपन्न...!


ओझर (नाशिक) प्रतिनिधी:
ओझर टाऊनशीप  : वर्षावास म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास. म्हणजेच पुर्वी पावसाळ्याच्या तीन महिने भिक्खूंना पावसांत हिंस्रपशुपासुन  विषारी प्राण्यांपासून त्रास इजा होऊ नये म्हणून त्यांनी स्थानिक बुद्धविहारात अथवा स्तूपात राहून तेथील उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश देण्याची परंपरा असून त्याचे अनुकरण म्हणजेच या पावसाळ्यात भं.बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन केले अशा उपासक व बौध्दाचार्य यांचा अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते फेटा शाल गुलाबपुष्प देवून लुंबिनी बुध्दविहार ओझर टाऊनशीप येथे सत्कार करून उपोसथ व्रताची सांगता करण्यात आली. या प्रसंगी रिपब्लिकन नेते काकासाहेब खंबाळकर यांचे नेतृत्वाखाली दिक्षाभुमी नागपूर हुन प्रारंभ झालेल्या संविधान बचाव रैलीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.


यावेळी काकासाहेब खंबाळकर यांचा फेटा शाल गुलाबपुष्प देवुन रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात काकासाहेब खंबाळकर म्हणाले की डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दीलेले संविधान हे देशाला समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता, न्याय या संविधानिक तत्त्वांना जपत वाटचाल करणारे आहे. मात्र आजची देशातील परिस्थिती पाहता या मूलभूत तत्त्वांची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यासाठीच संविधान बचाव - देश बचाव चा नारा संपुर्ण राज्यात या रॅलीच्या माध्यमातून पोचवत असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी बौध्दाचार्य वाय डी लोखंडे गुरुजी, वैशालीताई जाधव, शामभाऊ पगारे, शिरीष जाधव, त्रिभुवन गुरुजी, भारतभाऊ गवई, दिगंबर वाघ आदींनी त्रिशरण पंचशील देवुन तर वसंतराव वाघ यांचे हस्ते भं.बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी आशाताई जाधव,   रंजनाताई जाधव, शारदाताई जाधव,  शिलाताई जाधव, यांनी मनोगत व्यक्त केले. शाहीर दिगंबर वाघ,  अशोकराव पगारे, मायाताई मोहीते, गाडेकर, मंगलताई पगारे यांनी गितगायन केले. या कार्यक्रमास राजनंदीनी आहीरे, संगिता पवार, वर्षा बोरसे, संजय मोहीते, शशीभाऊ जाधव, वनिताताई जाधव, ऊतम जाधव, बाबुराव प्रधान, नानासाहेब वाघमारे, कोमल जाधव, असलम शेख, शनशोद्दीन आझाद, कमलेश डांगळे, राजेंद्र जाधव, अमर डोगले, शरिफ खाटीक. प्रदीप पगारे, संदीप साबळे, प्रिती म्हसदे, निर्मला गायकवाड, संगिता गायकवाड, अजय शेजुळ, सुधाकर गायकवाड, विनोद हिरे, संतोष शेजवळ, सागर जाधव, चार्वाक जाधव, शशांक जाधव, राणी जाधव, किशोर गवई, लीलाताई प्रधान, करण सोनवणे, उषाताई डांगळे, राजु भुतेकर, कृणाल जाधव, लताबाई केदारे, शालिनी गवई, नितल गवई, द्रोपताताई सु.गायकवाड, रंजनाताई पगारे, सोमनाथ गांगुर्डे, दुर्योधन इंगोले, ताईबाई पवार, बेबीताई आहीरे, आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


सुत्रासंचालन शामभाऊ पगारे तर शेवटी आभार ओझर शहराध्यक्ष वर्षाताई बोरसे यांनी मानले. अन्नदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

पत्रकार वजीरभाई शेख -पाथर्डी
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close