अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा :
शेतकऱ्यांना हमखास व शाश्वत उत्पन्नाची हमी देणारा असा रेशीम उद्योग असुन जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (रोहयो) गंगाराम तळपाडे यांनी केले.
महारेशीम अभियान अभियान २०२४ चा शुभारंभ उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री. तळपडे यांच्या हस्ते चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
यावेळी क्षेत्र सहायक व्ही.बी. दळवी, बी.एम.पवार, वरिष्ठ क्षेत्र सहायक, राजकुमार पौळ, तांत्रिक सहायक आदी उपस्थित होते.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

