shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारताच्या अर्थशास्त्राच्या नोबेलची २५ वर्ष

       अमर्त्य सेन यांना कल्याणकारी अर्थशास्त्रातील योगदान आणि गरिबी, असमानता आणि सामाजिक निवड सिद्धांतावरील त्यांच्या कार्यासाठी १९९८ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले २०२३ या वर्षी ह्या जागतिक घटनेला  २५ वर्ष पूर्ण  झाली आहेत . अमर्त्य सेन यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. ज्यांना अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जाते १९१३ मध्ये हा पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होते. ज्यांनी शांतिनिकेतनमध्ये जन्मलेल्या या भावी अर्थशास्त्रज्ञाचे ‘अमर्त्य’ असे नामकरण त्या वेळी केले होते. अमर्त्य सेन म्हणजे जागतिक कीर्तीचे मानवतावादी बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ त्यांचा जन्म कलकत्ता येथे सुशिक्षित आणि सधन कुटुंबात झाला. सेन यांचे जीवन आणि त्यांची कामगिरी ही विशेषत: शिक्षणवेत्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांचे शिक्षण ढाका, शांतिनिकेतन, प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झाले. 


 प्रत्येक टप्पा त्यांनी सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण केला आणि केंब्रिज विद्यापीठातही ते बीएमध्ये पहिले आले. नंतर तेथेच त्यांनी पीएचडी केली. ते जाधवपूर विद्यापीठात त्यांच्या विभागाचे सर्वात तरुण अध्यक्ष होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी दिल्ली स्कूल, ऑक्सफर्ड, केंब्रिज, हार्वर्ड आणि इतर अनेक ठिकाणी अध्यापन कार्यही केले आहे. ते नेहमीच त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय शिक्षक राहिले आहेत. त्यांचे कार्य विसाव्या शतकातील महान अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्या वचनाचे जिवंत उदाहरण घालून देणारे आहे. केन्स म्हणाले होते की, निहित स्वार्थ आणि धडपडींचा नव्हे, तर प्राणपणाने कवटाळलेल्या कल्पना, धारणांचाच शेवटी विजय होतो. सेन यांनी केलेली सामाजिक निवड,भूक आणि दुष्काळ, न्याय आणि स्वातंत्र्य याविषयी त्यांच्या कल्पना दीर्घकाळ प्रचलित राहतील. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांबद्दलही ते स्पष्टपणे बोलत आले आहेत. एकदा तीन हजार विद्यार्थ्यांसमोर एका मोठय़ा सभेत त्यांना उत्सुकतेने एक प्रश्न विचारण्यात आला, ‘‘सर, भारत महासत्ता कधी होणार?’’ ज्यावर त्यांनी उत्तर दिले की, त्यांना या शोधात अजिबात रस नाही त्यांना आर्थिक विषमत  भारतातून कमी  होऊन शिक्षण आरोग्य  सुविधा समाजातील शेवटच्या वर्गाला मिळेल  तरच  भारताच्या महासत्ता होण्याला अर्थ आहे असे ते म्हणत .
सेन यांचे कल्याणकारी अर्थशास्त्रावरील कार्य विशेषतः प्रभावशाली ठरले आहे आणि त्यांच्या कल्पनांनी आर्थिक कल्याणाचे वितरण आणि गरिबी आणि असमानतेचे मोजमाप याविषयी अर्थशास्त्रज्ञांच्या विचारसरणीला आकार देण्यास मदत केली आहे. सामाजिक निवड सिद्धांतावरील त्यांच्या कार्याद्वारे, सेन यांनी व्यक्तींच्या पसंती समजून घेण्यासाठी आणि त्यांना एकत्रितपणे एकत्रित प्राधान्य कसे बनवता येईल हे समजून घेण्यासाठी बहु-विषय दृष्टिकोन घेण्याचे महत्त्व दाखवून दिले आहे. या कार्याचा अर्थशास्त्राच्या क्षेत्रावर खोलवर परिणाम झाला आहे आणि गरिबी आणि असमानता मोजण्यासाठी नवीन पद्धती विकसित झाल्या आहेत.
सेन यांना दुष्काळ आणि अन्नटंचाईची कारणे यावरील त्यांच्या कार्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते. १९४३ च्या बंगालच्या दुष्काळावरील त्यांच्या कार्यासाठी ते प्रसिद्ध आहेत, ज्याचा त्यांनी तपशीलवार अभ्यास केला आणि दुष्काळ आणि अन्नटंचाईची मूळ कारणे शोधण्यासाठी केस स्टडी म्हणून वापरली. 
बंगालच्या दुष्काळावरील त्यांच्या कार्याद्वारे, सेन यांनी दुष्काळाच्या विकासातील आर्थिक आणि राजकीय घटकांचे महत्त्व अधोरेखित केले आणि समस्या समजून घेण्यासाठी बहु-विषय दृष्टिकोन घेण्याचे महत्त्व दाखवले.
सेन यांनी अनेक सन्माननीय पदे भूषविली : इकॉनॉमिक सोसायटीचे अध्यक्ष (१९८४), द इंटरनॅशनल इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९८६-८९), इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९८९) व अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९९४). सेन यांनी कल्याणाच्या अर्थशास्त्राला नवा अर्थ, नवी दिशा दिली त्याला तात्त्विक-नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांच्या कार्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिल्या. कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचा सिद्धांत तसेच दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला (१९९८). नंतर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान त्यांना प्राप्त झाला (१९९९). त्याच वर्षी बांगला देशाने त्यांना आपल्या देशाचे सन्माननीय नागरिकत्व दिले. २०१२ मध्ये अमेरिकेने त्यांना नॅशनल ह्यूमॅनिटी मेडल देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार पहिल्यांदाच बिगर अमेरिकन तज्ज्ञाला दिला गेला.
सेन यांनी चीनमधील बीजिंग विद्यापीठातील ‘सेंटर फॉर ह्यूमन अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्टडीज’चे संचालक म्हणून उत्कृष्ट काम केले आहेत..१९ जुलै २०१२ रोजी त्यांची नालंदा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली होती 
१९८१ साली सेन यांनी गरिबी आणि दुष्काळ  हे पुस्तक प्रकाशित केले ज्यात त्यांनी असा युक्तिवाद केला की दुष्काळ केवळ अन्नाच्या अभावामुळेच नव्हे तर अन्न वितरणासाठी यंत्रणेत बांधलेल्या विषमतेमुळे होतो सेन यांच्या इतर लेखनात डेव्हलपमेंट अॅज फ्रीडम (१९९९); तर्कशुद्धता आणि स्वातंत्र्य (२००२), सामाजिक निवड सिद्धांताची चर्चा; द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन: रायटिंग्ज ऑन इंडियन हिस्ट्री, कल्चर अँड आयडेंटिटी (२००५); एड्स सूत्र: अनटोल्ड स्टोरीज फ्रॉम इंडिया (२००८) अश्या प्रसिध्द ग्रंथ पुस्तकांची यादी आहे.
 अशा प्रकारे सेन यांचे जीवन आणि त्यांची कामगिरी योगदान  ही विशेषत: शिक्षणवेत्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.  आजही सेन हे अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आणि महत्त्वाच्या आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चेत आघाडीवर आहेत. त्यांच्या कल्पना आणि योगदानाचा अर्थशास्त्राच्या क्षेत्रावर कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे  आणि इतर अनेक अर्थतज्ञांना या महत्त्वाच्या समस्या हाताळण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.म्हणून तर ते वयाच्या १०० वर्षाच्या जवळपास जाऊन देखील आज अनेक आर्थिक सामाजिक प्रश्नांची उत्तरे देऊन करोडो तरुण युवा वर्गाचे आदर्श आहेत .

शब्दांकन:
= प्रा. गणेश शेळके 
अर्थशास्त्र विभाग प्रमुख 
कला वाणिज्य विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आश्वी खुर्द,ता. संगमनेर जि. अहमदनगर
-----------------------------------------------------

*वृत्तविशेष सहयोग
*ज्येष्ठ पत्रकार गुलामरसुलभाई जहागीरदार
(उर्फ जी.एम.) अहमदनगर 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close