💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐
🌸🌺🌼 खिराजे अकिदत 🌸🌺🌼
जो जन्माला आला त्यास परतून जाणे हे अटळ आहे,तथा मरण हे कोणालाच चुकलेले नाही, मनुष्य जरी जगातून जरी निघून जातो मात्र त्याची किर्ती ही अजरामर राहते.
राहुरी येथील आमचे स्नेही,परममित्र,पत्रकार, पैगंबरवासी मुख्तारभाई सय्यद यांचे कार्य देखील असेच आहे, सर्वांना आपल्या निर्पेक्ष मैत्रीच्या सानिध्यात ठेवणाऱ्या अशा दिलदार मित्राच्या अचानक निघून जाण्याने मित्रत्वाच्या जगतातील न भरुन निघणारी पोकळीक निर्माण झाली आहे,मात्र नियतीपुढे कोणालाच जाता येत नाही. दिवसामागुन दिवस जातात या म्हणी प्रमाणे खरोखरच त्यांच्या आपल्यातून जाण्यास ३ वर्ष उलटली असलीतरी आज मुखतारभाई आपल्यात नाहीत हे मानन्यास मन तयार होत नाही, मात्र सत्य हे जरी किती ही कटू असलेतरी त्याचा स्विकार हा करावाच लागतो ते नाकारुन चालत नाही आणी चालणारे ही नसते. आज दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी त्यांचे चौथे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस (खिराजे अकिदत) विनम्र अभिवादन !
अल्लाहतआला जन्नतूल फिरदौस (स्वर्ग) मध्ये त्यांना उत्तमातीउत्तम जागा देवो हीच अल्लाह चरणी प्रार्थना.
- शौकतभाई शेख (पत्रकार)
समता फाऊंडेशन - श्रीरामपूर
तथा सर्व पत्रकार मित्र मंडळ

