पुणे प्रतिनिधी:
दि.१० फेब्रूवारी २०२४ रोजी साखर कामगारांची बैठक झाली.राज्यातील साखर कामगारांच्या वेतन वाढ़ीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपत आहे.नवीन वेतनवाढ मिळावी यासाठी शासनाकडे सर्व समावेशक वेतनवाढीची मागणी करणार येणार आहे.तथापी नवीन वेतनवाढ देण्यासाठी तातडीने त्रिपक्ष समिती गठित करावी या मागणीसह बदलाची नोटीस व
करावयाच्या मागण्यांचा मसुदा तयार करून तो राज्य शासनास लवकर सादर करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.
शनिवार दि.१० फेब्रूवारी रोजी
पुणे येथे साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या कार्यालयात काळे यांच्या अध्यक्षेतेख़ाली प्रतिनिधी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.त्यावेळी मार्गदर्शन करताना काळे बोलत होते.साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राव साहेब पाटील,सरचिटणीस शंकरराव भोसले,कोषाध्यक्ष प्रदीप बनगे,उपाध्यक्ष युवराज रणवरे, नितीन बेनकर, अशोक बिराजदार, प्रदीप शिंदे,सचिव सयाजी कदम, राजेंद्र तावरे, संजय मोरवाळे, संजय पाटील,योगेश हंबीर,मुळा कारखाना साखर कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार, सेक्रेटरी डी.एम.निमसे, पाथर्डी तालुका राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सदस्य शेषनारायण म्हस्के,एकनाथ जगताप आदि यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील साखर कामगारांना वेतनवाढ देणाऱ्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपत असून त्रिपक्ष समिती तातडीने गठीत करावी, बदलाची नोटिस देणे, या आणि इतर मागण्याचा मसुदा तयार करून राज्य शासनाला सादर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
पुणे येथील राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीप्रसंगी अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांचा सत्कार करताना पाथर्डी तालुका राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सदस्य शेषनारायण म्हस्के, एकनाथ जगताप, प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष राऊपाटील, अशोकराव बिराजदार, युवराज रनवरे, मुळा कारखाना कामगार युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार, सेक्रेटरी डी.एम.निमसे आदि.
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

