-------------------------------------
रमजानुल मुबारक -२०२४
शनिवार दि.१६ मार्च २०२४
माहे रमजान - रोजा नं. ०५
------------------------------------
हजरत अनस बिन मालिक रजि.हे प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांचें मित्र सांगतात की , प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनीं सांगितले की, " तुम सेहरी खाया करों , सेहरी खानैं मे बरकत है ".(सहीह बुखारी शरिफ, हा.नं.१९२३).तसेच,जैद बिन साबित रजि.हे प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांचें मित्र सांगतात की, " आम्ही प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांच्या बरोबरच सेहरी खावून नंतर आम्ही सकाळच्या फर्ज नमाज अदा केली आहे ".
रोजा( उपवासा) ची संकल्पना जवळपास सर्वच धर्मांमध्ये आहे मात्र रमजान महिन्यातील रोजे थोडे फरक आहे कारण यामध्ये सकाळी ४-३० वाजता उठून सुर्योदयापुरवी तुम्ही कष्टातून मिळालेल्या शिदोरी( हलाल ) , अन्न सुर्योदय पुर्वी अन्न ग्रहण -खाने करणं यालाच " सेहरी " संबोधले जाते.
नंतर दरम्यानचा काळ सुर्योदय ते सुर्यास्ता पर्यंत जवळ जवळ १२:३० ते १४ तासांच्या अंतरावर काहीच खायचं पेयचं नसतं म्हणजे नाही.असे तीस( ३० ) दिवसांपर्यंत चालणार आहे. अर्थात तीस दिवसात आपल्या शरीराची व मानसिकतेची कठोरपणे परीक्षाच असते.मुळात रोजा ठेवण्याचा साध्य हा शारीरिक सह मानसिक जास्त आहे,
दिव्य कुरआन मधे म्हटलेले आहे की," हे श्रध्दावानांनों (ईमानल्यांनो ) आम्ही तुमच्यावर जे रोजे अनिवार्य करण्यात आले आहेत ; ज्या प्रमाणे तुमच्या आगोदरच्या प्रेषितांच्यां अनुयायीं ( समुदायायीं) वर अनिवार्य केले गेलेले होते ; यामुळे आशा आहे की, तुमच्या मध्ये तकवा ( चारित्र्या) चे गुण उत्पन्न होतील ( दिव्य कुरआन पारा नं.१ सुरह नं.२, अल-बकराह आ.नं.१८३).रोजे हे मानवांच्या चांगले चारित्र्याचे गुण निर्माण करण्यासाठी आवश्यक असतात ..असो.
म्हणूनच तुम्हाला १२ ते १४ तास सुरुवातीच्या उन्हाळ्यात उपाशीपोटी राहावयाचे .अन्नाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, त्यामुळे अन्नाच्या प्रत्येक प्रक्रिया व गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहे, दिवसभर थकवा जाणवू नये म्हणून पुर्णपणे संतुलित व पोषक तत्त्वांनी युक्त आहार घेणे गरजेचे असते,सेहरीसाठी पोट भरल्यासोबतच हेल्थी व शरीराला दिर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी संपूर्ण धान्य, ओट्स, अंडी, मटण,दही , दुध ,रोटी, ई हळूहळू पचतात असे पदार्थ खाणे गरजेचे आहे, जास्त व्हिटॅमिन ए. बी.सी. डी.व मिनरलस व तंतुमय पदार्थांचे सेवन अवश्य खावीत . तळलेले पदार्थांपासून शकतो दुरचं राहा , त्याऐवजी बेकींग व शिजवून घेतलेलं अन्न निवडा कारण शिजवून घेतलेल्या अन्न हे आरोग्यदायी असून त्यामधील पोषक तत्व जास्त वेळ टिकून राहते.
फास्ट फूड तर बिलकुल घेऊच नयेत , बर्गर, फ्रेंच राईस, मॅगी, पिझ्झा, हे जास्त गोड ,फॅटटी , जास्त मिठामधे तळलेले- प्रॉसेस केलेले पदार्थ शक्य होईल टाळावेच , हे पदार्थ शारीरिकदृष्ट्या नुकसान देह असतात . यामध्ये कधी कधी सिंथेटिक केमिकल असण्याची शक्यताही नाकारता येत नाहीत, म्हणून फास्टफुड पदार्थ जितके अधिक टाळता येईल तेवढे टाळावे.मिठाच्या प्रमाणाची काळजीपूर्वक नियोजन करावे:- करणं शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होउन तुम्हाला डिहायॾ्शेन होण्याची शक्यता असते, शरीरातील इलेक्ट्रॉलाईट ईनबॅलंन्स होण्याची शक्यता जास्त असते . पाण्याचं प्रमाण जास्त ठेवून तुमच्या शरीराचं बॅलन्स टिकून राहील व तुमच्या दिवसभरातील आपल्या कामाला उर्जा शिल्लक राहिलं व आपल्या शरीरातील उष्णता कमी होणार नाहीत.कारण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी तुम्हाला रोजा तील सेहरीचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे.
म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनीं सांगितले की, "( सेहरी खाना बरकत है , अल्लाह ने तुम्हे नवाजा ( गौरविले आहे) है , तो सेहरी खाना कभी भी छोडो नहीं..सेहरी जरुर खाओं )". क्रमशः
( मित्रांनो लेखन आवडलं तर नक्कीच आपल्या मित्रांना, नातेवाईकांनां पाठवा,कृपया आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा)
*लेखन: डॉ सलीम सिकंदर शेख*
बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर- *9271640014
संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111