shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जेवढी शरद पवार साहेबांवर टीका होईल.तेवढा महाराष्ट्र ठामपणे पवार साहेबांच्या मागे उभा राहील - माजी मंत्री जयंतराव पाटील.

जेवढी शरद पवार साहेबांवर टीका होईल.तेवढा महाराष्ट्र ठामपणे पवार साहेबांच्या मागे उभा राहील - माजी मंत्री जयंतराव पाटील.
इंदापूर:- रेस कोर्सला निमा खुर्च्या मोकळ्या होत्या तरीही पंतप्रधान यांनी भाषणात टीका केली.परंतु महाराष्ट्राचा आत्मा शरद पवार आहेत.जेवढी शरद पवार साहेबांवर टीका होईल.तेवढा महाराष्ट्र ठामपणे पवार साहेबांच्या मागे उभा राहील.असा विश्वास  इंदापूर तालुक्यातील बावडा गावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

      यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालक आप्पासाहेब जगदाळे,राष्ट्रवादी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर,कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,
अशोक घोगरे,तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील,यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बावड्याची जनता खूप हुशार आहे.कोण कोणाचा का प्रचार करते.हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे.कोणाचा नाईलाज झाला आहे.हे तुम्हाला माहिती आहे.ज्यांचा आयुष्यभर ज्यांच्याबरोबर उभा दावा होता.त्यांचा प्रचार करण्याची वेळ,त्यांच्यावर आली यासारखे वाईट दुसरे काही आयुष्यात नाही.असा खोचक टोला माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला.
       
           पुढे मार्गदर्शन करताना जयंतराव पाटील म्हणाले की,तोंड दाबून बुक्क्याचा मार,मनात सर्व आहे.मात्र वरचा आदेश,आणि वरच्या आदेशाला घाबरणारी महाराष्ट्रात बरेच निघाले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
          मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो आहे.महाराष्ट्राचे चित्र फार बदलले आहे.त्यामुळे आता विरोधकांचे काही खरे नाही.असे चित्र झाले आहे.आमच्याकडे पुढारी कमी आहेत.सारे पळून गेली तरीही मोठ्या संख्येने महाविकास आघाडीला जनता साथ देत आहे.हे कशामुळे झाले याचे आत्मचिंतन 
राजकर्त्यांनी त्यांनी करावे असे आवाहन जयंतराव पाटील यांनी केले.
close