*भिमाई आश्रमशाळेत राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा स्मृतिदिन साजरा.*
(*राजमाता अहिल्याबाई होळकरांचे कार्य कौतुकास्पद.* - *नानासाहेब चव्हाण*)
*इंदापूर* :- ( दि.१३) राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आयुष्यभर सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी काम केले. त्यांनी केलेल्या पारदर्शक कारभारामुळे सर्व सामान्यांना न्याय मिळाला असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश कार्याध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी केले.
ते मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा व मुलांचे व मुलींचे अनुदानीत वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलातील आवारात आयोजीत स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेस पुष्पहार. तथागत गौतम बुद्ध मूर्तीस व दिवंगत रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतिमेस पुष्प अर्पण करत संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरेंनी अभिवादन केले.
यावेळी उपप्राचार्या सविता गोफणे, कु. सृष्टी शेंडगे (इ.९ वी) यांनी अहिल्याबाई होळकरांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी कार्यक्रमास संकुलातील प्राचार्या,मुख्याध्यापक,प्राध्यापक,अधीक्षक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.