*बावड्याच्या प्रा. सौ. आरती दीपक जगताप यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित.*
इंदापूर:- बावडा तालुका इंदापूर येथील प्रा. सौ.आरती दीपक जगताप यांना आविष्कार सामाजिक आणि शैक्षणिक फाउंडेशन भारत शाखा कोल्हापूर महाराष्ट्रच्या वतीने दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक, पद्मावती, स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ, सातारा रोड, पुणे येथे राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार-2024 देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कर्मवीरायण चित्रपटाचे डायरेक्टर, धनंजय भावलेकर, पुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, पुणे येथील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक श्री.सुरेश पाटोळे, चाटे शिक्षण समूह, पुणे विभाग पुणेचे, संचालक, मा.प्रा. फुलचंद चाटे, यशदा पुणेचे,मास्टर ट्रेनर, मा. श्री.विवेक गुरव, स्मार्ट भाषण कला अकॅडमी, बार्शी जिल्हा सोलापूरचे, संचालक,श्री. सचिन वायकुळे,कार्यक्रमाचे मुख्य आयोजक,संस्थापक /राष्ट्रीय अध्यक्ष, आविष्कार सामाजिक आणि शैक्षणिक फाउंडेशन इंडिया शाखा कोल्हापूरचे मा.श्री.संजय पवार (पत्रकार), अविष्कार फाउंडेशनचे पुणे जिल्हाध्यक्ष मा.प्रा.डॉ. श्री. प्रकाश चौधरी , अविष्कार फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष,श्री दत्तात्रय सूर्यवंशी, आविष्कार फाउंडेशनचे पुणे विभागीय महासचिव, श्री. संजय घोडके, आविस्कार फाउंडेशनचे पुणे महासचिव,श्री. विलास आंबेकर, अविष्कार फाउंडेशनचे,पुणे शहराध्यक्ष,श्री.श्रीकांत जगताप, आविष्कार फाउंडेशनचे पुणे शहर सेक्रेटरी , डॉ. संतोष खलाटे, आविस्कार फाउंडेशनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष,श्री मनोज कंगले, अविष्कार फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.प्रा.डॉ. श्री. प्रकाश चौधरी यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. श्रीकांत जगताप यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार .डॉ.श्री. संतोष खलाटे, पुणे शहर सेक्रेटरी, आविस्कार फाउंडेशन इंडिया पुणे यांनी केले.
प्रा.सौ. आरती दीपक जगताप, सहाय्यक शिक्षिका, श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे कार्यरत असून त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या आणि करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार -2024 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. सौ. आरती जगताप यांनी माहिती तंत्रज्ञान, संगणक, डिजिटल कॅमेरा, मोबाईल, इंटरनेट, इत्यादी मायावी माध्यमाच्या पसाऱ्यात मर्यादशील होऊन काळाबरोबर वृतस्थपणे झोकून देऊन त्या काम करीत असून समाजाप्रती असलेली तळमळ, सामाजिक निष्ठा आणि प्रेम यामुळेच त्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण काम केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने "राज्यस्तरीय ज्ञानज्योती पुरस्कार -2024"त्यांना देऊन गोरविण्यात आले.
त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना वेगवेगळ्या समाजातील गरजवंत मुलामुलींना शिक्षण घेत असताना शिक्षणात येणाऱ्या अडचणी प्रती शैक्षणिक व आर्थिक मदत सामाजिक भावनेने करुन विद्यार्थ्यांना दिलासा आणि आत्मविश्वास मिळेल अशाच प्रकारचे कार्य केले आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून कार्यरत राहिल्या. उच्च माध्यमिक विभागात माता- पालक संघाची जबाबदार यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यामुळे इयत्ता 12वी विज्ञान शाखेचा कृषि विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा निकाल हा सलग 21 वर्षे 100% आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणारे चार विद्यार्थी आहेत. तसेच प्राथमिक आश्रम शाळेतील गोरगरीब मुलांना सोलर हिटर भेट दिला आहे. त्यांच्या या मदत व प्रयत्नामुळे अनेकांना नवसंजीवनी मिळाली असून हा गौरव म्हणजे कृतज्ञता होय. शैक्षणिक क्षेत्रात समाज उन्नतीसाठी प्रयोगशील असे काम केले आहे. समोर आलेल्या संकटांना कधीही न घाबरता संकटांना आव्हान म्हणून घेतले आणि पार करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली. यश मिळवणे हेच डोक्यात ठेवले त्यामुळे या क्षेत्रात उतुंग असे कार्य केले.