श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेमध्ये तब्बल 38 वर्षांनी दहावी व बारावी बॅचचा स्नेह मेळावा संपन्न.
इंदापूर: वालचंदनगर ( ता. इंदापूर ) मधील श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेमध्ये तब्बल 38 वर्षांनी शैक्षणिक सन 1986-87 ( इ. 10 वी ) व 1988-89 ( इ. 12 वी ) च्या संपूर्ण बॅचचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. या स्नेह मेळाव्यास 100 हुन अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटताना त्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.
श्री वर्धमान विद्यालयाच्या प्रांगणात भव्य दिव्य हा सोहळा साजरा करण्यात आला. माझी शिक्षक, शिक्षिका व शिपाई यांचे बुके व गुलाब पुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात आले. अतिशय उत्कृष्ट अशी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या सर्व आनंदमय वातावरणाचे क्षण फोटोग्राफर कडून फोटो व व्हिडिओ शूटिंग द्वारे टिपून घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे चेअरमन श्री मकरंद वाघ, व्हाईस चेअरमन श्री प्रशांत महामुनी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री हनुमंत कुंभार व उप मुख्याध्यापक श्री निकम यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच माझी शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व माझी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
सर्व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेतील गमती जमती ची मजा सांगितली. आलेल्या सर्व मान्यवरांना चहा, नाष्टा व दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पंकज पाटील , व आभार प्रदर्शन श्री हरिश्चंद्र डोळे यांनी मानले.
माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आधुनिक पद्धतीचा डिजिटल बोर्ड विद्यालयास भेट दिला. या बोर्डचा उपयोग आधुनिक पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना होणार आहे.
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.