प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : दि . २२ / अहमदनगर म.न.पा. च्या वतीने नगर येथील पांजरपोळ संस्थेत दाखल करण्यात आलेल्या जनावरांचे ऑडिट करा अश्या आशयाचे निवेदन बजरंग दलाच्या अहमदनगर म.न.पा. आयुक्तांना देण्यात आले आहे.
ज्यांच्यावर गोवंशाची कत्तल, तस्करी व अवैध वाहतूक करण्याचा गुन्हा नोंद आहे, अश्या लोकांकडे येथील जनावरांचा ताबा दिला जातो असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनात आले आहे. सदर घटना अशी की म.न.पा. कोंडवाडा विभागा मार्फत १३ सप्टेंबर रोजी पांजरपोळ येथे तेरा गोवंशीय जनावरे पाठविण्यात आली होती, त्यातील तीन जनावरांचा ताबा कोंडवाडा विभागाने कसलीही शाहनिशा न करता ज्यांच्यावर गोवंशाची कत्तल, तस्करी व अवैध वाहतूक करण्याचा गुन्हा नोंद आहे, अश्या लोकांकडे येथील जनावरांचा ताबा दिला असे निदर्शनात आले, तसेच ताबा दिलेली ही जनावरे संशयस्पद रित्या पॅकबंद पीकअप गाडीमध्ये भरून घेऊन चालले होते, परंतु पोलिस आले आल्याचे समजताच पुन्हा ही जनावरे पांजरपोळ संस्थेत आणून सोडली.
यापूर्वी ही अशी जनावरे कासायांना कसलीही शहनिशा न करता कत्तलीसाठी देण्यात आली असल्याचा गोरक्षकांना खात्री आहे, तसेच ताब्यात दिलेली जनावरे पुन्हा तपासली जात नाहीत, म्हणून पांजरपोळ येथील जनावरांचे ऑडिट करावे अशा आशयाचे निवेदन अहमदनगर म.न.पा. आयुक्तांना देण्यात आले यावेळी बजरंग दलाचे सतीश (नाना) मोरे, चांगदेव भालसिंग, सागर भांबरे, अविनाश सरोदे, ओंकार फिरोदे, बंटी वायकर, प्रदीप वारुळे, किरण जगताप साई टल्लू, अनिकेत बांगर, ओंकार देवकर, अजय शेळके आदि उपस्थित होते.