श्रीरामपूर / प्रतिनिधी:
हल्ली मोडिफाय केलेल्या सायलेन्सरच्या दुचाक्या श्रीरामपूर शहरात नागरीकांची प्रचंड डोकाफोड ठरत आहे.
जरासा अंधार पडला रे पडला की हिरोगीरी करण्यासाठी काही शिदाडं या दुचाक्या घेवून बाहेर पडतात,या दुचाक्यांचा वेगही प्रचंड असतो,जीवाची पर्वा न करता ही शिदाडं भरधाव वेगाने आपल्या दुचाक्या चालवतात, यामुळे अनेकांना धक्का,धडक लागुन गंभीर दुखापती होत आहेत, यासोबतच भांडणाचे प्रमाणही वाढत आहेत. करीता शहर पोलिसांनी याविरुद्ध मोहिम उघडून या शिदडांना जरासा सुंदरी प्रसाद दिल्यास असे प्रकार कमी होतील शिवाय त्रस्त शहरवासी देखील पोलिसांना आशिर्वाद देतील, करीता शहरातील समस्त त्रस्त नागरीकांकडून पोलिस प्रशासनास नम्रतेची विनंती आहे की अशा शिदडांची तक्रार करण्यासाठी पोलिस खात्यातर्फे एखादा मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात यावा तथा प्रत्यक्ष शहनिशा करुन या शिदाडांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणीही जोर धरु लागली आहे.

