मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा आठ गडी राखून पराभव करत विजयाचे खाते उघडले. वानखेडेवर सोमवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गतविजेत्या केकेआरने २० षटकांत सर्वबाद केवळ ११६ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने रायन रिकेल्टनच्या अर्धशतकाच्या जोरावर अवघ्या १२.५ षटकांत लक्ष्य गाठले आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणले. यापूर्वी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने पराभूत केले होते.
आयपीएल मधील केकेआरवर मुंबईचा हा २४ वा विजय आहे. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर एएआयने कोलकाताचा दहाव्यांदा पराभव केला आहे. ४३ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवत मुंबईने गुणतालिकेत मोठा अपसेट निर्माण केला आहे. दोन गुण आणि ०.३०९ च्या निव्वळ रनरेटसह, मुंबई सहाव्या स्थानावर तर केकेआर दहाव्या स्थानावर घसरला. त्यांच्या खात्यात निश्चितपणे दोन गुण आहेत पण केकेआरचा निव्वळ धावगती -१.४२८ झाला. सध्या, आरसीबी आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत शिर्षस्थानी आहे, ज्याने आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये चार गुण जिंकले आहेत. त्याचा निव्वळ रन रेट + २.२६६ आहे.
विजयासाठीच्या ११७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन यांच्यात पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी झाली. आंद्रे रसेलने रोहितला हर्षित राणाकरवी झेलबाद केले. रोहितने १२ चेंडूत १३ धावा करता आल्या. या मोसमात भारताचा माजी कर्णधार पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. यानंतर रायनला विल जॅकची साथ मिळाली. रसेलने ९१ धावांवर मुंबईला दुसरा धक्का दिला. जॅक्स १६ धावा करू शकला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने चमकदार कामगिरी करत केवळ नऊ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज ६२ धावा करून नाबाद राहिला. त्याने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
तत्पूर्वी, आयपीएलमधील पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाज अश्विनी कुमारच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला ११६ धावांत गुंडाळले. या मोसमातील हा पहिला सर्वात कमी धावसंख्या ठरला. केकेआर आयपीएलमध्ये दहाव्यांदा १२० पेक्षा कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला. विशेष म्हणजे केकेआर केवळ मुंबई इंडियन्सविरुद्ध सहा वेळा सर्वबाद झाला आहे.
या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अश्विनी कुमारने भेदक गोलंदाजी केली. त्याने अवघ्या तीन षटकांत केवळ २४ धावा देत चार बळी मिळविले. आयपीएलच्या इतिहासातील भारतीय गोलंदाजाची ही पदार्पणातील सर्वोत्तम कामगिरी आहे. कोलकाताच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. पॉवर प्लेमध्येच त्यांचे ४१ धावांवर चार विकेट गमावल्या. त्यांच्यासाठी अंगीकृष रघुवंशीने सर्वाधिक २६ धावा केल्या. याशिवाय कर्णधार अजिंक्य रहाणेने ११, रिंकू सिंगने १७, मनीष पांडेने १९ आणि रमणदीप सिंगने २२ धावा केल्या. त्याचवेळी पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता करता आला नाही. मुंबईतर्फे दीपक चारने दोन तर ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, विघ्नेश पुथूर आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
अश्विनीने केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर बाद करून हा पराक्रम केला. अश्विनीच्या आधी मुंबईकडून अली मोर्तझा, अल्झारी जोसेफ आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्या आहेत. या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा अश्विनी कुमार घातक फॉर्ममध्ये दिसला. रहाणेशिवाय अश्विनीने रिंकू सिंग, मनीष पांडे आणि आंद्रे रसेल यांना आपला बळी बनविले.
आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा अश्विनी हा दहावा गोलंदाज आहे. अश्विनीपूर्वी, मथिशा पाथिराना हा आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारी शेवटची गोलंदाज होता. पाथीरानाने सन २०२२ मध्ये गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलला बाद करून ही कामगिरी केली होती. अश्विनी शिवाय ईशांत शर्मा, विल्किन मोटा, शेन हरवूड, अमित सिंग, चार्ल लँगडेव्हेट, अली मोर्तझा, टी पी सुधींद्र, अल्झारी जोसेफ आणि मिथिशा पाथिराना यांनी ही कामगिरी केली आहे. अश्विनी कुमारने पदार्पणातच तीन षटकांत ११ धावा देत चार बळी घेतले. आयपीएलच्या इतिहासातील पदार्पणातील गोलंदाजाची ही चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे. अश्विनीची ही कामगिरी पदार्पणातील भारतीयाची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमध्ये पदार्पणातील सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम अल्झारी जोसेफच्या नावावर आहे, ज्याने २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध बारा धावांत सहा विकेट घेतल्या होत्या.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही मुंबई इंडियन्सचास्टार फलंदाज रोहित शर्माची बॅट शांत राहिली. तो केवळ तेरा धावा करून बाद झाला. या मोसमात हिटमॅनला आतापर्यंत काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. यापूर्वी त्याने गुजरातविरुद्ध आठ धावा केल्या होत्या, तर चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. आश्चर्याची बाब म्हणजे रोहितला आयपीएलच्या शेवटच्या दहा डावांमध्ये केवळ १४१ धावाच करता आल्या आहेत. त्याने फक्त एकदाच २० पेक्षा जास्त धावा केल्या, गेल्या मोसमात लखनौविरुद्ध ६८ धावांची खेळी केली होती. या सामन्यात रोहितला आंद्रे रसेलने आपला शिकार बनवले. टी२० प्रारूपात वेस्ट इंडिजच्या या गोलंदाजाविरुद्ध, रोहितने १६ डावांमध्ये १६३.५ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना १३९ धावा केल्या आहेत. आयपीएलमधील केकेआरवर मुंबईचा हा २४ वा विजय आहे. त्याचबरोबर वानखेडे स्टेडियमवर मुंबईने कोलकाताचा दहाव्यांदा पराभव केला आहे. ४३ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवत मुंबईने गुणतालिकेत मोठा अपसेट निर्माण केला आहे. दोन गुण आणि ०.३०९ च्या निव्वळ रनरेटसह, मुंबई सहाव्या स्थानावर तर केकेआर दहाव्या स्थानावर घसरला. त्यांच्या खात्यात निश्चितपणे दोन गुण आहेत पण केकआरची निव्वळ धावगती -१.४२८ झाला. सध्या, आरसीबी आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत शिर्षस्थानी आहे, ज्याने आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये चार गुण जिंकले आहेत. त्यांचा निव्वळ रन रेट + २.२६६ आहे.
मुंबईचा पराभवा तिढा एकदाचा सुटला. आता मुंबई हाच विजयाचा धागा पकडून कसा पुढे जातो व आपले सहावे विक्रमी जेतेपद मिळवितो का ? हे बघणे निव्वळ औत्सुक्याचे नसेल तर मनोरंजकही असेल.
@ डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२