महात्मा फुले यांच्या विचाराची क्रांती थांबणार नाही - अमर बोराटे
इंदापूर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने दि.11/4/2025 रोजी महात्मा फुले नगर ,बोराटे वस्ती,भरणेवाडी येथे अभिवादन सभेचे आयोजन केले होते. या प्रसंगी आपल्या भाषणात समतावादी चळवळीचे कार्यकर्ते अमर बोराटे म्हणाले, महात्मा फुले यांच्या प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला विरोध करणे म्हणजे बहुजन समाजाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे.चित्रपट आज ना उद्या प्रदर्शीत होईल, ही लढाई केवळ एका चित्रपटासाठी नाही तर समतेच्या स्वप्नासाठी आहे. म्हणून महात्मा फुले यांच्या विचाराची क्रांती थांबणार नाही.
अब्बास भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या अभिवादन सभेत बाबासाहेब चवरे,मा.युवराज म्हस्के,माजी प्राचार्या मंगला वाघमोडे,प्रा.गुलाब वाघमोडे यांची भाषणे झाली.
या सभेस महिला, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा. भारत बोराटे यांनी मानले.अशी माहिती प्रा.गुलाब वाघमोडे यांनी दिली
-------------------------------------
चौकट:
, आयुष्यभर भाजपात मी काम केले पण बहुजन समाजाचे कल्याण व्हावे अशी धोरणे भाजपात नाहीत म्हणून भाजपाला सोडचिठ्ठी दिली. पण मी थांबणार नाही तर परिवर्तनासाठी शेवटपर्यंत लढणार आहे.
-बाबासाहेब चवरे
-----------------------------
महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेची भूमिका घेऊन बहुजनांमध्ये जागृती घडविली.आत्ता आपण ही लढाई अधिक गतिमान केली पाहिजे.- राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस युवराज म्हस्के.
-----------------------------
महात्मा फुले यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मुलींची पहिली शाळा काढली आणि सावित्रीबाई फुले यांना हेडमिस्ट्रेस बनविले. सावित्रीबाई फुले यांनी जातीयवाद्यांचा जुलूम सहन करत समग्र स्त्रियांचा उद्धार केला. मी प्राचार्या झाले त्या पदावर सावित्रीबाई, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचीच सही होती हे मी ठामपणे सांगते कारण त्यामुळेच माझ्यामध्ये समतेची आंतरिक प्रेरणा निर्माण झाली - माजी प्रा. श्रीमती मंगला वाघमोडे.