shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामीण पत्रकार संघ व नमो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ऐतवरनाथ गड येथे वृक्षारोपण संपन्न ..


वृक्षारोपण काळाची गरज - डॉ . अनिल करांडे

प्रतिनिधी : धीरज लांडगे

अहिल्यानगर :  भिंगार भागातील चांदबिबी महाल येथील ऐतवरनाथ बाबा गड येथे रविवार दि . २४ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, नमो बहुउद्देशीय संस्था आणि म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले .

यावेळी आंबा , वड , चिंच, औदुंबर , पिंपळ , आवळा आदी झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण डॉ . अनिल करांडे , पत्रकार धीरज लांडगे, मंगेश केवळ ,  डॉ . राजेंद्र थोरात , महेश केवळ ,पत्रकार डॉ . संजय वायकर यांच्या हस्ते करण्यात आले .

वृक्षारोपण ही काळाची गरज असुन नागरिकांनी त्याचे महत्व लक्षात घेतले पाहिजे . विविध वृक्षांची लागवड करून निसर्गाचा समतोल राखण्याचे काम प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी डॉ . अनिल करांडे यांनी केले . पुढील काळात साधारण दहा हजार वृक्ष लावण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला . ग्रामीण पत्रकार संघ आणि नमो संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी उपस्थित सर्वांच्या वतीने संस्थेचे आभार व्यक्त केले .
close