shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पद्मभूषण अण्णा हजारे : एक महान देशभक्ताची तेजस्वी गाथा

राळेगणसिद्धीच्या मातीपासून उठलेला एक तेजस्वी सूर्य, ज्याच्या देशभक्तीच्या प्रकाशाने संपूर्ण भारत उजळून निघाला – तो म्हणजे अण्णा हजारे! पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित झालेले हे नाव आजही लोकशाहीच्या मंदिरात सत्य, अहिंसा आणि भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे प्रतीक मानले जाते.


शौर्याची शपथ घेतलेला माजी सैनिक, आणि समाजक्रांतीसाठी आयुष्य वेचणारा एक निष्कलंक कार्यकर्ता – अण्णा म्हणजे संयम, साधेपणा आणि सत्याची साक्षात मूर्ती. त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध उभारलेला झंझावात केवळ एक आंदोलन नव्हते, तर तो होता सामान्य माणसाच्या आवाजाचा पहिला गर्जना!

अण्णांचे जीवन म्हणजे तपश्चर्येचा यज्ञ. त्यांनी आपल्या गावाला केवळ आदर्श ग्राम बनवले नाही, तर त्यातून संपूर्ण भारताला "स्वराज्य" म्हणजे काय, हे शिकवले. त्यांचे शब्द नव्हते, ते मंत्र होते; आणि त्यांचा संघर्ष नव्हता, तो होता युगपरिवर्तनाचा उद्घोष!

"मी तुमच्यासाठी लढतोय!" – हे शब्द अण्णांनी उच्चारले की, लाखोंच्या उरात नवा आशेचा स्फुलिंग पेटतो. त्यांनी दाखवलेली धैर्यगाथा आजही प्रत्येक युवकाच्या मनात जनचळवळीची ज्योत प्रज्वलित करते.

अण्णा हजारे हे केवळ व्यक्ती नाहीत, ते एक चळवळ आहेत, एक विचार आहेत, आणि या राष्ट्राच्या आत्म्याचा एक अविभाज्य भाग आहेत. अशा या तेजस्वी देशभक्तास मानाचा मुजरा...!

पत्रकार सुनील दायमा 

राहुरी 

close