shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बिबट्याच्या भीतीत शेतकरी. दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठ्याची राष्ट्रवादी काँग्रेसची महावितरणाकडे मागणी.


अहिल्यानगर (प्रतिनिधी)-  गावांमध्ये व शेती परिसरात बिबट्या तसेच इतर हिंसक प्राण्यांचा वाढता वावर पाहता शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भीतीमुळे शेतकरी रात्री शेतीकामासाठी जाण्यास असमर्थ आहेत. याच पार्श्वभूमीवर शासन आणि महावितरणाने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्याची योजना लागू केली असली, तरी प्रत्यक्षात दिवसाच्या वेळेत केवळ तीन तासच वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

दिवसा मिळणारा अल्प वीजपुरवठाामुळे सिंचनाचे काम अर्धवट राहते, पिकांची वाढ बाधित होते आणि सुरक्षेचा धोका अधिक गंभीर बनतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मंजूर केलेला दिवसा आठ ते दहा तासांचा पूर्णवेळ वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून रात्रीचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद ठेवावा आणि दिवसा स्थिर, अखंड वीज उपलब्ध करावी, असा आग्रहही पक्षाने व्यक्त केला आहे. यासोबतच वीज पुरवठ्यातील अनियमितता, लोडशेडिंग, कमी व्होल्टेज यांसारख्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच शेतकऱ्यांना अचूक वीज वेळापत्रकाची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

या सर्व मागण्यांसाठी विद्युत महावितरणाचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे, तालुका अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, भरत बोरवे, चंद्रकांत पवार, गणेश तोडमल, महेश शेळके, युवराज हजारे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शेतीच्या हितासाठी दिवसा स्थिर वीजपुरवठा हा काळाची गरज असल्याचे पक्षाने स्पष्ट केले.
close