सावळीविहीर राजकुमार।गडकरी :
उन्हाळा कडक जाणवायला सुरुवात झाली आहे, त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे शाळा , महाविद्यालये दुकाने, कामधंदा सर्व बंद असल्यामुळे अनेक तरुण नुकत्याच गोदावरी उजवा कालव्याला आलेल्या उन्हाळी आवर्तनामुळे दुपारी पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.मात्र यावेळी सामाजिक दूरीच भान ठेवलं जात आहे.
राहता तालुक्यातून जाणारा गोदावरी उजवा कालवा उन्हाळी आवर्तन सोडल्यामुळे काठोकाठ भरून वाहत आहे, त्यामुळे सध्या या कालव्याच्या आसपासचे तरुण मुले भर दुपारच्या वेळेत या कालव्यामध्ये पोहण्यासाठी येत असतात. सध्या कालव्याला पाणी असल्यामुळे या वाहत्या पाण्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. तर काही आपल्या शेतातील विहिरी मध्ये भर दुपारी पोहण्याचा आनंद घेत अंतरा अंतरावर पोहत असतात.सामाजिक दुरीचं भान ते ठेवत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. लॉकडाऊन मुळे सर्व बंद आहे.शिर्डीचे वॉटर पार्क बंदआहे.त्यात कडक उन्हाळा अशा परिस्थितीत भर दुपारी उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी व दुपारचा टाईमपास करण्यासाठी काहीजण या गोदावरी उजवा कालव्याच्या पाण्यात वाटरपार्क समजूनच पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. असे चित्र गोदावरी उजवा कालवा च्या लगत असणाऱ्या कोळपेवाडी सावळीविहीर, निमगाव, निघोज, शिर्डी, नंदुरखी, राहता, पिंपळस तालुक्यातील गावांमध्ये सध्या दिसत आहे.या कालव्याच्या पाण्यात आसपासच्या वस्तीवरील गाया, म्हशी असे पाळीव प्राणी ही दुपारच्या वेळेस पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेत असतात. अनेक ठिकाणी महिला कपडे धुण्यासाठी , कुणी आपल्या शेळ्या-मेंढ्या पाळीव प्राणी पाणी पाजण्यासाठी आणत असतात. तरुण मुले तर सूर्यास्त होईपर्यंत या पाटामध्ये पोहत असतात. त्यामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीतही गोदावरी उजवा कालव्याच्या कडेला दुर दुर का होईना पण माणसे दिसून येत असतात. सध्या या कालव्याला पाणी आल्यामुळे राहता तालुक्यातील कालवा परिसरातील सर्वजण खुश असल्याचे दिसून येत आहेत. या कालव्याला पाणी आल्यामुळे विहिरींनाही पाणी वाढले आहे. तसेच अनेक साठवण बंधारे भरले गेले असल्यामुळे सध्या पिण्याच्यापाण्याची टंचाई फारशी नाही. गोदावरी उजवा कालव्याला आलेल्या या उन्हाळी आवर्तनामुळे शेतकरी ,तरुण तसेच नागरिक,महिला सर्वजण खुश आहेत. लॉकडाऊन सुरू असला तरी तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र कालव्याला पाणी आल्यामुळे विहिरींच्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शेतकरी शेतातील पिकांना पाणी देण्यात मग्न दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील लॉकडाऊन पेक्षा ग्रामीण भागातील लॉक डाऊन मात्र जरा शिथिल वाटत आहे.असे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
उन्हाळा कडक जाणवायला सुरुवात झाली आहे, त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे शाळा , महाविद्यालये दुकाने, कामधंदा सर्व बंद असल्यामुळे अनेक तरुण नुकत्याच गोदावरी उजवा कालव्याला आलेल्या उन्हाळी आवर्तनामुळे दुपारी पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत.मात्र यावेळी सामाजिक दूरीच भान ठेवलं जात आहे.
राहता तालुक्यातून जाणारा गोदावरी उजवा कालवा उन्हाळी आवर्तन सोडल्यामुळे काठोकाठ भरून वाहत आहे, त्यामुळे सध्या या कालव्याच्या आसपासचे तरुण मुले भर दुपारच्या वेळेत या कालव्यामध्ये पोहण्यासाठी येत असतात. सध्या कालव्याला पाणी असल्यामुळे या वाहत्या पाण्यात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. तर काही आपल्या शेतातील विहिरी मध्ये भर दुपारी पोहण्याचा आनंद घेत अंतरा अंतरावर पोहत असतात.सामाजिक दुरीचं भान ते ठेवत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. लॉकडाऊन मुळे सर्व बंद आहे.शिर्डीचे वॉटर पार्क बंदआहे.त्यात कडक उन्हाळा अशा परिस्थितीत भर दुपारी उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी व दुपारचा टाईमपास करण्यासाठी काहीजण या गोदावरी उजवा कालव्याच्या पाण्यात वाटरपार्क समजूनच पोहण्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. असे चित्र गोदावरी उजवा कालवा च्या लगत असणाऱ्या कोळपेवाडी सावळीविहीर, निमगाव, निघोज, शिर्डी, नंदुरखी, राहता, पिंपळस तालुक्यातील गावांमध्ये सध्या दिसत आहे.या कालव्याच्या पाण्यात आसपासच्या वस्तीवरील गाया, म्हशी असे पाळीव प्राणी ही दुपारच्या वेळेस पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेत असतात. अनेक ठिकाणी महिला कपडे धुण्यासाठी , कुणी आपल्या शेळ्या-मेंढ्या पाळीव प्राणी पाणी पाजण्यासाठी आणत असतात. तरुण मुले तर सूर्यास्त होईपर्यंत या पाटामध्ये पोहत असतात. त्यामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीतही गोदावरी उजवा कालव्याच्या कडेला दुर दुर का होईना पण माणसे दिसून येत असतात. सध्या या कालव्याला पाणी आल्यामुळे राहता तालुक्यातील कालवा परिसरातील सर्वजण खुश असल्याचे दिसून येत आहेत. या कालव्याला पाणी आल्यामुळे विहिरींनाही पाणी वाढले आहे. तसेच अनेक साठवण बंधारे भरले गेले असल्यामुळे सध्या पिण्याच्यापाण्याची टंचाई फारशी नाही. गोदावरी उजवा कालव्याला आलेल्या या उन्हाळी आवर्तनामुळे शेतकरी ,तरुण तसेच नागरिक,महिला सर्वजण खुश आहेत. लॉकडाऊन सुरू असला तरी तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र कालव्याला पाणी आल्यामुळे विहिरींच्या पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शेतकरी शेतातील पिकांना पाणी देण्यात मग्न दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील लॉकडाऊन पेक्षा ग्रामीण भागातील लॉक डाऊन मात्र जरा शिथिल वाटत आहे.असे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.


