shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाज्योती वर्षभरानंतरही कागदावरच...? विमुक्त-भटके-विद्यार्थी अस्वस्थ.. ! ना निधी ना यंञना..!!

लातूर । विशेष प्रतिनिधी :
बार्टी, सारथीच्या धर्तीवर इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी राज्य शासनाने 'महाज्योती' या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. माञ संस्थेला वर्ष उलटूनही या संस्थेसाठी ना निधीची तरतूद झाली ना पदभरती करून यंञना कार्यान्वित झाली. त्यामुळे महाज्योती वर्षभरापासून कागदावरच रखडली असून यामुळे भटके-विमुक्त विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. असे भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे म्हणाले.
                         प्रा.श्रीकांत मुद्दे 

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत तयारी करता यावी, उच्च शिक्षण घेता यावे यासाठी पुण्यात बार्टी (डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) उत्तम काम करीत आहे. त्याच प्रमाणे सारथी (राजर्षी छञपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था) या संस्था काम करत आहेत. माञ अद्यापही ज्यांच्यापर्यंत घटनात्मक सोयी-सुविधांचा लाभ पोहोचला नाही असा घटक म्हणजे विमुक्त-भटके समूदाय होय. वडार, रामोशी, कैकाडी, लोहार आदी भटके-विमुक्त जाती-जमातीमधील उच्च शिक्षण सुकर व्हावे यासाठी महाज्योती संस्था मागील वर्षी ९ ऑगस्ट रोजी स्थापन करण्यात आली. या माध्यमातून भटके-विमुक्त विद्यार्थ्यांना एमपीएससी, युपीएससी, नीट, जेईई, पीएच्.डी. आदींसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. माञ संस्थेच्या स्थापनेनंतर काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका लागल्या, सरकार बदलले, त्यानंतर लगेच कोरोनाचे संकट राज्यावर ओढवले. या सर्व घडामोडींमध्ये शासनाचे महाज्योतीचा कारभार सुरळीत सुरू करण्याकडे दुर्लक्ष झाले.

महाज्योती संस्थेच्या स्थापनेला वर्ष उलटून गेल्यानंतरही जैसे थे स्थिती आहे. भटके-विमुक्त विद्यार्थ्यांना आजतागायत कुठलाही लाभ मिळालेला नसल्याने ही संस्थाच बंद पाडण्याचा डाव तर नाही ना, अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे शिक्षण तरी कसे घेणार, तसेच शैक्षणिक कर्ज देण्यासही बॅका टाळाटाळ करत आहेत. असे अनेक प्रश्न विद्यार्थी व्यक्त करत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी हवालदिल झाले आहेत; असे मुख्यमंञ्यांना पाठविलेल्या निवेदनात  भटके-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी म्हटले आहे.
close