निखिल आंब्रे यांच्या तुलाच पहावेसे वाटते या कवितेला मुंबईकरांचा भरभरुन प्रतिसाद..!!
प्रतिनिधी | नवी मुंबई :
मुंबईमधील युवा अभिनेता निखिल आंब्रे यांनी झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ,अगबाई सासुबाई,सोनी मराठीवरील स्वराज्य जननी जिजामाता,स्टार प्रवाह वरील मोलकरीण बाई अशा मालिकेंमध्ये आपली छोटी मोठी भुमिका साकारली आहे.अभिनयाबरोबरच त्यांना कवितेची सुध्दा आवड असल्याने त्यांनी स्वत: एक सुंदर अशी कविता लिहीली आहे.
"तुलाच पहावेेसे वाटते" असे या कवितेचे नाव आहे. या सुंदर कवितेला मुंबईकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल अभिनेते निखिल आंब्रे यांचे कौतुक देखील सर्वत्र होत आहे. ही गोष्ट त्यांच्यासाठी अभिमानास्पद आहे.

