नवी दिल्ली - दि. ११ नोव्हेंबर
भारत सरकारच्या केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण व व्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील श्रीशिवाजीनगर येथील रहिवासी असलेले पत्रकार शिवाजी घाडगे यांना बुधवार दि. ११ नोव्हेंबर २०२० रोजी देशाचे उपराष्ट्रपती मा. व्यंकय्या नायडू यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये ऑनलाइन कार्यक्रमात *राष्ट्रीय जल पुरस्कार* (नॅशनल वॉटर अवॉर्ड 2019) देऊन गौरवण्यात आलें आहे.
उपराष्टपती एम व्यंकय्या नायडू, केंद्रीय जल मंत्री गजेद्र सिंह शेखावत, केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया, केंद्रीय सचिव यु पी सिंह याच्या उपस्थित नविदिल्ली येथील विज्ञान भवनात दुसरा राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण समारंभ ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. यात गेल्या अनेक वर्षा पासुन जल व्यावस्थापनावर लिखाण व प्रबोधन केल्या बद्दल महाराष्ट्रातील पत्रकार शिवाजी घाडगे यांना राष्ट्रीय जल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलें आहे.
जलसंधारण कामांत लोक सहभाग वाढल्याने कामांत वाढ होऊन पावसाचे वाहुन जाणार पाणी जमिनीत मुरविल्या मुळे गावाला जलशक्तीचा आधार मिळाला, गावात शाश्वत पाणी उपलब्ध होण्यासाठी सिचनाचा ताळमेळ बसविला तर पावसाळ्यात वाहुन जाणारे पाणी गावात साठवण तलावात साठविल्याने याचा उपयोग गावाला होतो, तसेच भुगर्भातील पाणी पातळी वाढल्याने याचा उपयोग शेती सिचनाला किफायतशिर संरक्षित पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी गावांतील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित केल्या तर पाणी साठा वाढविणे, भूजल अधिनियम अंमलबजावणी विकेद्रीत पाणी साठा निर्माण करणे, बंधारे, पाझर तलाव ,सिमेंट बंधारे, लोक सहभागतुन गाळ काढणे पाण्याचे नियोजन ताळेबंदी बाबत जनतेत जागृती करुन लोकांना पाण्याचे महत्व समजून त्यांचा जपून वापर करणे, पाणलोट विकासाला गती देणे, लघु पाटबंधारे दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन दुरुस्ती, नुतनीकरण, साखळी सिमेंटनाला बंधायची कामे, नाला खोलीकरण, रुंदीकरण, गावतलाव, साठवण तलाव, शिवकालीन, ब्रिटिशकालीन तलाव, अहिल्याबाई बारव, ओढे नाले ,विहीर पुनर्भरण, पाण्याचा स्त्रोत बळकटी हा उदात्त हेतू समोर ठेवून जलशक्ती मुळे राज्यांत जलसंधारण कामांत वाढ होऊन पाणी पातळी वाढन्यास मदत झाली. याचा उपयोग शेतीच्या सिंचना साठी जास्तीत जास्त कसा होईल याबद्दल जनजागृती केली.
"भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय जल पुरस्कार दिल्या बद्दल आपण केद्रीय जल मंत्रालयाचे आभार मानतो या राष्ट्रीय जल पुरस्कार मुळे भविष्यात सार्वजनिक जीवनात सामाजिक काम करण्यासाठी बळ मिळेल हा पुरस्कार नवराष्ट्रासाठी तसेच समाज्यांतील कष्टकरी जनतेला तसेच तमाम पत्रकारांना समर्पित" केल्याचे पत्रकार शिवाजी घाडगे यांनी सांगितले.
"पत्रकार शिवाजी घाडगे याना या आगोदर राज्य सरकारने सलग तीनं वर्षं महात्मा गांधी तंटा मुक्ती पुरस्कार तसेंच ग्रंथमित्र डाॅ एस आर र॔गनाथन ग्रंथमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. व आता केन्द्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्काराने त्यांना सन्मानित केल्या बद्द्ल महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

