एरंडोल - एरंडोल नगरपरिषदेने अंजनी नदी काठवर केलेले नागरिकांचे अतिक्रमण काढले अंजनी नदी काठी नागरिकांनी टपरी टाकून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले होते याची दखल घेत नगर पालिका प्रशासन ने फारुख खाटीक अंजुम हाश्मी शेख शेख सलीम शेख मजिद व शेख इसुब यांचे अतिक्रमण काढले.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री किरण शामराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एस डी धमाल (कार्यालय अधीक्षक) श्री विनोदकुमार दगाजी पाटील (अति विभाग प्रमुख)श्री सौरभ (रचना सहाय्यक) श्री एस आर (ठाकूर क्षेत्रीय अधिकारी) श्री सुरेश दाभाडे श्री रघुनाथ महाजन श्री तुषार शिंपी श्री कैलास देशमुख भूषण महाजन शहर तांत्रिक अधिकारी श्री राहुल ठाकूर यांच्या पथकाने कारवाई केली
कोणत्याही नागरिकाने शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यास नगरपालिका प्रशासन कारवाई करेल असा इशारा मुख्य अधिकारी श्री किरण शामराव देशमुख यांनी दिला आहे.

