संगमनेर । प्रतिनिधी( ऋषिकेश जगताप):-
शनिवारी संगमनेरमध्ये आले २९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह..!, प्रशासनाने व राज्य शासनाने एवढे कडक निर्बंध करून ही कोरोना रुग्ण संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. २९७ जाणंच्या अहवालामध्ये, जिल्हा प्रयोगशाळेतून,९२, रॅपिड,पीसीआर खाजगी प्रयोगशाळेतून १३३, आणि रॅपिड ॲन्टिजेन चाचणीतून ७२, असे तब्बल २९७, जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव आले आहेत.
लोकांनी या कठीण काळात घरीच बसावे, अत्यावश्यक सेवेसाठीच घराबाहेर पडावे. असे आवाहन संगमनेर चे तहसीलदार, अमोल निकम यांनी केले आहे. संगमनेर मध्ये पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा नाहीये व बेडही शिल्लक नाही. अशा परिस्थितीत जनतेने आपआपली काळजी घ्यावी. अशी विनंती संगमनेरच्या तहसीलदार अमोल निकम यांनी केली आहे.

