shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शेतीला मत्स्यशेतीसारख्या जोडव्यवसायाची आवश्यकता- मत्स्यव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शेतीला मत्स्यशेतीसारख्या जोडव्यवसायाची आवश्यकता
- मत्स्यव्यवसाय विकास राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे.

  मंत्रालयामध्ये 'ॲग्रोटेक' मासिकाच्या मत्स्यव्यवसाय विशेषांकाचे प्रकाशन राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे हस्ते.

इंदापूर प्रतिनिधी:(२५ ऑगस्ट २०२१) शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शेतीला मत्स्यशेतीसारख्या जोडव्यवसायाची आवश्यकता असून शेततळ्यात, विहीरीत व तलावात शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विकास राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी
मुंबई मंत्रालयामध्ये 'ॲग्रोटेक' मासिकाच्या मत्स्यव्यवसाय विशेषांकाचे प्रकाशन करताना  केले.

         याप्रसंगी मासिकाचे संपादक गणेश हाके यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे सांगून राज्यमंत्री नामदार  भरणे  म्हणाले की, व्यक्तिगत, समूह पद्धतीने मस्त्यशेती करु इच्छिणारे शेतकरी, मच्छिमार, मत्स्यव्यवसायिक यांच्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अनेक योजना आहेत. त्याशिवाय या योजनांमध्ये महिलांनाही प्राधान्य दिले जाते. पुढील काळात मत्स्यशेतीला प्राधान्य देण्यासह स्वतंत्र योजनाही राबविण्याचा शासनाचा मानस आहे. तरी या योजनांचा लाभ घेऊन सर्व संबंधित घटकांनी प्रगती साधावी. मत्स्यव्यवसायासाठी लागणारे आधुनिक तंत्रज्ञान व अर्थसहाय्य शासनाकडून दिले जाईल, असे ना. भरणे  यांनी यावेळी सांगितले.
close