shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जीवन संघर्ष : सामाजिक वेदनांचा कारवाँ



(  पुस्तक परीक्षण  -  प्रा . पंढरी बनसोडे ,  कवी / लेखक  / साहित्यिक ,  मो :-  ८३९ ०३६३२६५  )

              नुकताच  नवनाथ रणखांबे यांचा  " जीवन संघर्ष "  हा कविता संग्रह वाचण्यात आला खूप छान शब्दांकन , रेखाटन मानवी समाजाचे चित्रण करणारा दलित , वंचित समाजातल्या लोकांचे दुःख मांडणारा कवी नवनाथ रणखांबे यांनी अत्यंत गरिबीतून , अथक परिश्रमातून समाजातल्या लोकांचे प्रश्न मांडत आयुष्य जगले आहे .  " जीवन संघर्ष "  दलित चळवळीला उर्जा देणारा खूप संवेदनशील असा  कवितासंग्रह पहिलाच जरी असला तरी विविध साहित्यसंमेलनातून त्यांची ' कविता '  गावा- गावात पोहचली आहे.  माणसाला जीवनात संघर्षा शिवाय काही प्राप्त होत नाही . जगण्याचा , पोटाचा , भूकेचा प्रश्न   महत्त्वाचा कवीला वाटत राहतो . या काव्यसंग्रहातील खूप कविता प्रेरणा देणाऱ्या असून नवकवींसाठी मार्गदर्शक ठरतील यात शंका  नाही .

१ ) ' माय तुला मी पाहिलंय ........

या कवितेत ग्रामीण जीवन दिसून येते कवी आपल्या मायेला म्हणतो की ,

गरिबीलाच लाज वाटली गरिबीची
जीवनाला उपासमारी होती जगण्याची 
सोबतीला हिंमत रित्या हातांची ....
................... माझ्या स्मृतीने 
त्या हिंमतीला माय त्याला मी पाहिलंय
त्याला मी पाहिलंय ......
त्याला मी पाहिलंय ........

२ )  ' माजेऱ्या पाऊस .......

या कवितेत कवी पाऊसाची ' दशा ' आणि ' दिशा '  स्पष्ट करतो . खूप पडतोस कधी ओला कधी सुखा  दुष्काळ नशिबाला येतो . बळीराजांची वेदना प्रकटते 
कवी म्हणतो  ----

जिथे गरज,  तिथे नाहीस, 
जिथे नको,  तिथे आहेस , 
तुझी हानी,  सहन होत नाय ,
सोसल्या शिवाय, पर्याय नाय ,

३ ) ' बा नं शिकवलं '  

' बा '  माझा ओरडला 
लेका आजपासून तुझी 
शिक्षण हिच   ' आई '
करियर हाच   ' बा '
मुंबई हिच   ' पांढरी '
परत आला  माघारी 
तर तंगडं तोडीन .........

वरील कवितेत शिक्षणातूनच  खरा विकास होतो.  डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला होता .  हे अधोरेखित करणारी भावस्पर्शी कविता आहे .

४ ) ' भटकंती पोटाची अधोगती देशाची .....

या कवितेत वंचित , शोषित समाजाची दयनीय परिस्थितीवर   पुढीलप्रमाणे कवी प्रकाश टाकते  .....

अजूनही आहे बाजारबुणग्यांची....
सामाजिक भटकंती पोटाची , 
पिढया न् पिढया वंचना त्यागाची .....
पोटाच्या जीवन संघर्षाची , 
नाही शिक्षण , नाही रोजगार 
स्वातंत्र्य मिळता सात दशक 
अजूनही आहे वंचित ........

५ ) " जीवन संघर्ष "  या कवितेत जीवन जगताना येणारा संघर्ष त्यातून लढण्याचे बळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आपले उर्जा स्थान आहेत .
कवी म्हणतो, 

जीवन संघर्ष .....
वेदनांचे हुंकार .... 
वेदनांचे आक्रोश ......
कवितेने कागदावर .....
आता उमटवायचा .......

६ ) ' माणूस पण विसरला .....

या कवितेत माणसं खूप शिकली ,  मोठी झाली परंतू
माणूस पण पुरती विसरत चालली यांवर कविता ' मार्मिक भाष्य ' करते .....
कवी म्हणतो, 

माणसा तू माणसातला 
माणूस पण विसरला  ||
     भगवा , हिरवा 
      निळा , पिवळा 
धर्म  जात पंथ वाटला |

७ ) ' डॉ .  आंबेडकर .....

या कवितेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास अत्यंत क्लेशदायी जातियतेचे चटके 
बसून त्यांना खूप कठोर र्निभीड प्रज्ञावंत बनवितो .....
कवी म्हणतो , 

बाबा या दुनियेचा स्वाभिमान 
जागृत केलात .......
पिढया न् पिढयाचं शापित जीणं 
लाथाडलत .........
शिका ! संघटित व्हा !!  संघर्ष करा !!!
संन्मार्ग दिलात ......

८ ) ' बापाचं नाव लावायचं टाळलंस '

या कवितेत खूपच  ' भावस्पर्शी संवाद ' 
आपणास अनुभवांस मिळतात.
कवी म्हणतो , 

तुझ्या काळजाने काळजातच काळजाला
मज तू जाळलस आपल्या पोराला बापाच
नाव लावायचं टाळलस .......

नाव देईन माझे त्याला 
मोठा करिन मी त्याला
जमले तर उमजून घे
धुरा तुझी समजून घे .

       असा संवेदनशील कवी नवनाथ रणखांबे यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस खूप शुभेच्छा  ! 

पुस्तक -:  जीवन संघर्ष
कवी -:  नवनाथ रणखांबे  
प्रकाशन -: शारदा प्रकाशन ठाणे
स्वागत मूल्य -:  ८० ₹ 
प्रास्ताविक   -:  प्रा. डॉ. शहाजी कांबळे 

शब्दांकन - : प्रा . पंढरी बनसोडे ,
लातूर.  कवी /  लेखक /साहित्यिक
close