shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नाव्होलीच्या बळीराजाला सापडला परीस... "राजमाने " केले मालामाल.!


दोन वर्षातील उत्पन्नाने नाव्होलीचे शेतकरी झाले लखपती.!

आत्महत्येला वरदान ठरतोय पावटा राजमा.!
===================================

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:- 

गेल्या दोन तिन वर्षांपासून बिड जिल्ह्यातील शेतकरी राजाला नैसर्गिक आप्पतीने नेस्तनाबूत केले असुन खरीप असो की रब्बी कोणतेही पिक निसर्गाच्या लहरीपणामुळे हाती न लागल्याने शेतकरी राजावर मोठे आर्थिक संकट आले होते. त्यामुळे बरेज शेतकरी कर्जबाजारी झाल्याने व शेतातील ऊत्त्पन्न शुन्य झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी  आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले होते. परंतु नाव्होलीच्या शेतकऱ्यांनी या साऱ्या संकटातून वाट काढत नवीन पिकाची पेरणी करत अहोरात्र मेहनत करून या गावचा बळीराजा अक्षरशः लखपती झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
 

    
या बाबत अधिक माहिती अशी की बिड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून या जिल्हयाची सर्वत्र ओळख निर्माण असलेला जिल्हा या जिल्हयातील बळीराजा मात्र कधी आवर्षण म्हणजे कोरडा दुष्काळ... तर कधी ओला दुष्काळ... ज्याला अस्मानी संकटही म्हणता येईल. अशा संकटाचा सतत सामना करत तो  नेहमीच अशा नैसर्गिक आप्पतीचा बळी ठरलेला आहे. तो आत्तापर्यंत पारंपरिक पिके घेत होता. त्यामुळे त्याला अंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील शेतीमालाच्या भावाची चढउतार याची कधीच कल्पना नसायची त्यामुळे पारंपरिक पध्दतीने घेतल्या जाणाऱ्या कापूस, सोयाबीन, तुर , बाजरी,ज्वारी, गहु हरभरा या पिका बरोबरच कांदा बटाटा, मिर्ची असे भाजीचे पिके पण घेतले जात असायचे परंतु वरवर  हल्ली अलीकडच्या काळात निसर्गाच्या लहरीपणामुळे या पिकाचे फारसे ऊत्तपन्न मिळत नव्हते. ते वरवर घटत चालल्याने आता नेमके करावे काय..या विवंचनेत असतानाच नाव्होली येथील  शेतकऱ्यांना परीसाच्या रूपाने पावटा / राजमा या पिकाबद्दल माहिती मिळताच सर्व शेतकऱ्यांनी जुने पारंपरिक व  न परवडणारी पिके बाजूला ठेवुन नविन पावटा / राजमा या वाणाची लागवड करण्याचे धाडस केज तालुक्यातील नाव्होली गावच्या खंडु उर्फ दिपक येडबा बिक्कड या युवकाने केले. आणि पहाता पहाता या गावचे शेतकरी राजमाने मालामाल झाले. तसे पाहिले तर राजमा हे पिक पश्चिम महाराष्ट्रात घेतले जाणारे आणि ज्याला देशात आणि परदेशात ही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ते पिक म्हणजे "पावटा " ज्याला सर्वत्र
राजमा या नावाने ओळखले जाते.गेल्या दोन वर्षापूर्वी खंडु बिक्कड यांनी कृषी मंडळ अधिकारी श्री.अंभोरे साहेब व  कृषीसहाय्यक वाकळे साहेब यांच्या सल्ल्यानुसार आपल्या स्वतः च्या शेतावर राजमा या पिकाची लागवड केली त्यात त्यांना चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांनी ईतर शेतकऱ्यांना यात सामावून घेतले. आणि पहाता पहाता दोन वर्षांत नाव्होलीच्या सर्वच शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत पावटा/ राजमा या पिकाला आपलस केल.आणि या पिकाच्या लागवडीसाठी व ऊत्पन्नाच्या बाबतीत केज तालुक्यातील नाव्होली हे गाव आज बिड जिल्ह्यात नंबर  " एक "वर असुन नाव्होलीत व तालुक्यातील ईतर गावातील शेतकऱ्यांनी काढलेल्या  पिकाला विक्री करण्यासाठी  नाव्होलीतच श्रीराम ट्रेडर्स आणि बळीराजा ट्रेडिंग कंपनी माऊली कॉंप्लेक्स नाव्होली या ठिकाणी त्याची  विक्री केली जात असल्याने  नाव्होलीचे शेतकरी राजाच्या हातात पैसाच पैसा आला असुन नाव्होलीचे शेतकरी मालामाल झाले आहेत. 


कमी वेळेत व कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे हे पिक असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक पिकात बदल करून पावटा / राजमा या पिकाची लागवड करुन आपले उत्पन्न वाढवावे जेणे करून आत्महत्या सारखी वेळ आपल्या वर येणार नाही. असे मत श्रीराम ट्रेडर्स आणि बळीराजा ट्रेडींग कंपनीचे प्रमुख श्री. खंडु ऊर्फ दिपक बिक्कड यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले. हे खरेदी केंद्र नाव्होली येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधुन १७सप्टेंबर २०२१ रोजी सुरु करण्यात आले असुन हे केंद्र सुरु झाल्यापासून आजपर्यंत ९ हजार क्विंटल राजमा या मालाची खरेदी झाली असुन हा खरेदी केलेला संपुर्ण माल थेट दिल्लिला पाठवण्यात आला आहे. हे पिक प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात घेतले जात असल्याने या पिकाची खरेदी करण्यासाठी साठी याच भागातील काही उद्योजक या ठिकाणी बळीराजा ट्रेडींग कंपनीला सहकार्य करत असुन त्यात गुप्ता सेठ - दिल्ली., सम्मीत सातपुते - सातारा, श्रीप्पात हुल्लोरो (खजिनदार)- सातारा सातारा ,खंडु / दिपक येडबा बिक्कड - नाव्होली, निलेश राजमाने - कराड ,बापु कोडलकर - सातारा , संजय (मामा) कणसे - कराड , रोहित महामुने - वडुज, तुषार मनेकर- पिंपोडे सातारा , अश्पाक शेख / बबलुभाई (अध्यक्ष हमाल संघटना सातारा) यांच्या सहकार्याने गावात मोठा उद्योग उभा राहिला असुन या ठिकाणी अनेक बेरोजगारांना रोजगार  मिळाला असल्याने शेतकऱ्या बरोबरच आता मजुरवर्गही आनंदीत झाला आहे.
 
..

पावटा / राजमा हे पिक खरिपाचे सोयाबीन पिक घेतल्यानंतर रब्बी साठी या पिकाची पेरणी करावी. ज्यांच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे. त्यांनी आजच्या काळात पावटा हे पिक घेणे काळाची गरज असुन आज रोजी नाव्होली गावच्या शिवारात शंभर एक्करच्या वर पावटा / राजमा  पिकाची पेरणी केलेली असुन याचा भाव सात हजारा पासुन ते अकरा हाजारापर्यंत असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणे गरजेचे आहे.

-----श्री. सखाराम सुखदेव बिक्कड व अच्युत निवृत्ती बिक्कड  माऊली कॉम्पलेक्स नाव्होली. (शेतकरी)
close