1.चैत्र (मार्च-एप्रिल )-
या काळात गुळाचे सेवन करु नये. सकाळी रिकाम्यापोटी कडुलिंबाची 4-5 पाने, कडुलिंबाच्या झाडाची आंतर साल यांचा एक कप काढ़ा घेतल्याने बरेच आजार ठीक होतात.
2.वैशाख (एप्रिल -मे )-
या महिन्यात तेलाचा आहारात कमीतकमी उपयोग केला पाहिजे. कारण या काळात शरीरात रोग होण्याची संभावना जास्त असते. या महिन्यात बेलाच्या पानांचे सेवन अतिशय लाभदायक असते.
3.ज्येष्ठ (मे -जून)-
या महिन्यात गर्मी जास्त प्रमाणात असल्या मुळे दुपारी एखादा तास झोपले पाहिजे. या काळात शिळं अन्न बिलकुल खाऊ नये. शिळया अन्नामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
4.आषाढ़ (जून-जुलै )-
या महिन्यात सर्वानी आपल्या वयानुसार शक्य होईल तेवढा व्यायाम आणि खेळ खेळाला पाहिजे.
या काळात पाचनशक्ती कमी असते. हलका आहार घ्यावा. बेलाचे सेवन करू नये.
5.श्रावण (जुलै -आँगस्ट )-
या काळात हिरव्या पालेभाज्या आणि दुध आरोग्य वर्धक आहे. या महिन्यात हिरड्या चे सेवन जरुर करावे.
6.भाद्रपद (आँगस्ट -सप्टेंबर )-
हा पावसाळ्यामधील शेवटचा काळ, आजुबाजूला डबकी साचलेली असतात. संसर्गजन्य रोग असतात. दवाखान्यात गर्दी असते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधे घ्यावीत.
7.आश्विन (सप्टेंबर -ऑक्टोबर )-
या काळात गुळाचे सेवन आरोग्यवर्धक आहे.
या महिन्यात कारले खावू नये.
8.कार्तिक (ऑक्टोबर -नोव्हेंबर )-
या महिन्यात ताक पिणे हानिकारक आहे. मुळा लाभदायक आहे.
9.मार्गशिष :( नोव्हेंबर -डिसेंबर )-
हा आरोग्य वर्धक महीना आहे. व्यायाम करणे फायदेशिर आहे. या काळात जास्त थंडी असते. या काळात जास्त गरम, जास्त थंड पदार्थाचे सेवन करू नये.
10.पौष (डिसेंबर -जानेवारी )-
या महिन्यात दुध पिणे आरोग्य वर्धक आहे.पण या काळात धने - धने कूट भाजीत वापरू नये.
11.माघ (जानेवारी -फेब्रुवारी )-
या काळात शुद्ध तुपाचे सेवन आरोग्य वर्धक आहे.
या महिन्यात खड़ी साखर खाऊ नये
12.फाल्गुन (फेब्रुवारी -मार्च)-
या महिन्यात सकाळी गार पाण्याने स्नान करणे आरोग्य वर्धक असते.
या काळात चने खाणे हानिकारक असते.

