श्रीरामपूर - हिंदु सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे व्हावे या उद्देशाने सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्रीरामपूर यांच्या वतीने भव्य श्रीगणेश उत्सव निमित्ताने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. यात श्रीरामपूर शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.
यामध्ये विविध प्रकाराचे देखावे तसेच हिंदुस्थनामधील सांस्कृतिक, पारंपारिक, एैतिहासिक असे वेगवेळे देखावे तसेच व्यसनमुक्ती जनजागृती देखावे, स्वच्छत ा जनजागृति अभियान, बेटी बचाओ बेटी पढओ अभियान, तसेच सेंद्रीय फळे, भाजीपाला व इत्यादी खादद्य पदार्थ रसायनमुक्त उत्पदानावर भर देणे, निसर्गाचे महत्व अशा विविध प्रकारचे देखावे धार्मिक सामाजिक, सांस्कृतिक देखावे महिलांनी सादर केले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गोंधवणी येथील सौ. शिंदे यांनी मिळविले. सौ. शिंदे यांनी आपल्या देखाव्यामध्ये प्राणी, निसर्ग, वृक्ष निसर्ग याचे समाजामध्ये जनजागृती व्हावी यांचे महत्व पटवून दिले. दुसरे बक्षिस सौ. शेडगे, मेनरोड यांनी त्यांचा मालनांकन मिळविला त्यांनी त्यांच्या देखावेमध्ये रामायण याचे पुर्ण घटनाक्रमाचे कागदी चित्रीकरण सादर केले. तसेच तिसरे बक्षिस परदेशी यांनी गड, किल्लयांचा इतिहास व त्याचे महत्व याचे चित्रीकरण सादर केले. विजेत्यांना ट्रॉफी व रोख बक्षिस मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, सचिव, डॉ. संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष, संतोष डहाळे, तालुकाध्यक्ष आबा रोकडे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव विशाल शिरसाठ, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष गणेश रोकडे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी गणेेश उत्सव साजरे करण्याचे त्यांचे उद्देश लोकांनी एकत्र यावे, हिंदुचे सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे व्हावे. हिंदुंची एकजुट होऊन धर्म रक्षणाचे काम करावे म्हणून माझ्या माता-भगिनींना आव्हान करतो की, येत्या पुढील काळामध्ये हिंदू धर्माची संस्कृती टिकविण्यासाठी व समाजामध्ये सण उत्सवची जगजागृती करण्यासाठी व महिला शक्तीकरण करण्यासाठी व महिलांच्या समस्येचे निकारण करण्यासाठी एकत्र येणे फार जरुरीचे आहे. व तसेच सध्या चालू असलेल्या लव जिहादच्या विरोधात महिलांनी पुढाकार घेऊन महिलांनी आपल्या घरातील मुलींना हिंदू धर्माची माहिती, संस्कृति शिकविले पाहिजे व कशा पद्धतीने हिंदू धर्म संपूष्टात आणण्यासाठी जिहादी लोक मुलींची दिशा भुल करुन फसवणूक करुन धर्मांतर करत आहे याची जाणीव त्यांना करुन देणे गरजेचे आहे. तसेच माता-भगिनींनी वेळ प्रसंगी दुर्गामातेचे अवतार घेऊन धर्माचे रक्षण करण्यास पुढाकार घ्यावे अशी विनंती व आव्हान मनसे जिल्हाध्यक्ष यांनी केले. याप्रसंगी जिल्हा सचिव डॉ. नवथर, उपजिल्हाध्यक्ष संतोष डहाळे, विशाल शिरसाठ, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव याने आपले मनोगत व्यक्त करुन मार्ग दर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे तालुकाध्यक्ष आबा रोकडे, मनसे शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष राहुल बारसे, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल लोंढे, महिला सेना तालुकाध्यक्ष संगिता वाडिले, महिला सेना शहराध्यक्ष राजश्री ओहोळ यांनी अथक प्रयत्न केले. या प्रसंगी तालुका संघटक प्रविण कार्ले, सरचिटणीस संतोष भालेराव, शहर सरचिटणीस दिपक सोनवणे, अक्षय सुर्यवंशी, ज्ञानेश्वर काळे, गणेश राऊत महादेव ओहळ, किशोर वाडिले, लखन कडवे, विकास शिंदे, मारुती शिंदे, निलेश सोनवणे, रतन वर्मा, राजू शिंदे, विक्रांत शिंदे, संदिप विशंभर, अमोल साबणे, सुरेश शिंदे, समर्थ सोनार, अक्षय अभंग, भास्कर सरोदे, करण कापसे, अतुल खरात, विकी राऊत, नितीन कांबळे, नितीन पवार, ओंकार अनाप, संकेत शेलार, गौरव कुमावत राजू पोटरे, राम थोरात, साईनाथ राशिनकर, सागर वाणी, संकेत वायकर, गजानन सावंत, शिवनाथ फोपसे, किरण रणनवरे, विकी परदेशी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

