shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अंतःकरणात तळमळ असली की भगवंताचे दर्शन घडते - महंत रामगिरी महाराज

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपुर तालुक्यातील उंदिरगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव सांगता कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज यांनी अंत : करणात तळमळ असली की भगवंताचे  दर्शन घडते असे प्रतिपादन  केले. 

गेल्या ३० एप्रिल पासून ते ७ मे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कार्यक्रमाला महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांनी किर्तन सेवा दिली. शेवटच्या दिवशी सायंकाळी ६ वा महंत रामगिरी महाराज यांची रथातुन सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली. सप्ताह काळात ज्या भाविकांनी सकाळी चहा ,नाष्टा , सायंकाळ चे अन्नदान , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली त्यांना महाराजांच्या हस्ते श्रीफळ देऊन सन्मानीत केले . तसेच संत पुजन केलेल्या भाविकांना महाराजांच्या हस्ते ब्रम्हलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज यांची प्रतिमा , श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात आले . समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ तसेच गावातील तरुण युवकांचे महाराजांनी कौतुक केले . शेवटी महाराजांनी दहिहंडी फोडुन काल्याच्या किर्तनाने सांगता केली. उंदिरगांव व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते . सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.


*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close